सुखस्पर्शी लाटा अविरत वारा
अफाट जल अथांग
आणी हा समुद्रकिनारा
भावनांचा उद्रेक कधी उदासीनतेचा मारा
मनी आठवणींचे काहुर
आणी पारवा भिरभिरणारा
एकांताचा खडक विचारांचा झरा
कल्लोळ दाटलेला
आणी माझ्यातला मी तळमळणारा
मिटलेले ओठ डोळे पाणावले जरा
भरुन येई ऊर
आणी सुर्य मावळणारा
मन शांत होईपर्यंत बसे मी त्या समुद्रकिनार्यापाशी
तो विचारे मग मला, येशील ना रे उद्या?
आणी मी परतणारा..
╰» αвσυт мє
- ۩۞۩ मराठी कविता ۩۞۩
- Mumbai, Maharashtra, India
- एकटी स्वप्न माज़ी, मी स्वप्नातही एकटा. एकट्यांची ही गर्दी, या गर्दीत मी एक एकटा......मी स्वप्निल....
Monday, April 27, 2009
मैत्री असावी .........
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...
कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण...
आपल्या मैत्रीचे दिवस पंखाखाली घेत,
प्रेमाचे मृगजळ शोधतेयं माझे हे जीवन..
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवनारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...
कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण...
आपल्या मैत्रीचे दिवस पंखाखाली घेत,
प्रेमाचे मृगजळ शोधतेयं माझे हे जीवन..
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवनारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी
Wednesday, April 22, 2009
मला खुपदा प्रश्न पडतो...........
मला खुपदा प्रश्न पडतो
आयुष्य कसं असतं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या तळ्यासारखं
कुणीही यावं, एखादा दगड टाकुन जावं
दगड टाकणारा निघुन ज्जतो,
पाण्यात खळबळ माजवुन जातो,
अशा वेळेस काय करावं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या लाकडासारखं
कुणीही यावं, एखदी ठिणगी टाकुन जावं
वाळ्लेलं असेल तर जाळ होतो नाहीतर .
नुसताच धुर ओल्या लाकडाचा
अशा वेळेस काय करावं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या प्याद्या सारखं
आपला रस्ता फक्त सरळ असतो
पण त्यात कुणीही मधे येतो,
हत्ती, घोड, वजिर अणि कधी कधी राजा सुध्धा
मागेही वळता येत नाही,
अशा वेळेस काय करावं?
पण मला वाटतं...
आयुष्य कसं असावं?
ढगातुन पडणार्या पावसाच्या सरी सारखं
तिला कुणीही अडवु शकत नाही
तिला कुणीही जाळु शकत नाही
एकदा वरुन खाली झोकुन दिल्यावर
तिला माहित नसतं, आपण कुठे पडणार आहोत
शेतातल्या काळ्या मातीवर की,
शहरातल्या डाबंरी रस्तावर
कुणा धनिकाच्या रौक गार्डनवर वर कि
कुणा गरीबाच्या झोपडीवर?
रस्तावर बसलेल्या भिकर्याच्या थाळित कि,
'येरे येरे पावसा' म्हणत सोडलेल्या कागदाच्या होडित?
पण कोठेही पडो
तिचा उद्देश एकच असतो
दुसर्याला निर्मळ बनवन्याचा
दुसर्याला फुलविण्याचा
दुसर्याला आनंद देण्याचा........
मी....
आयुष्य कसं असतं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या तळ्यासारखं
कुणीही यावं, एखादा दगड टाकुन जावं
दगड टाकणारा निघुन ज्जतो,
पाण्यात खळबळ माजवुन जातो,
अशा वेळेस काय करावं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या लाकडासारखं
कुणीही यावं, एखदी ठिणगी टाकुन जावं
वाळ्लेलं असेल तर जाळ होतो नाहीतर .
नुसताच धुर ओल्या लाकडाचा
अशा वेळेस काय करावं?
कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या प्याद्या सारखं
आपला रस्ता फक्त सरळ असतो
पण त्यात कुणीही मधे येतो,
हत्ती, घोड, वजिर अणि कधी कधी राजा सुध्धा
मागेही वळता येत नाही,
अशा वेळेस काय करावं?
पण मला वाटतं...
आयुष्य कसं असावं?
ढगातुन पडणार्या पावसाच्या सरी सारखं
तिला कुणीही अडवु शकत नाही
तिला कुणीही जाळु शकत नाही
एकदा वरुन खाली झोकुन दिल्यावर
तिला माहित नसतं, आपण कुठे पडणार आहोत
शेतातल्या काळ्या मातीवर की,
शहरातल्या डाबंरी रस्तावर
कुणा धनिकाच्या रौक गार्डनवर वर कि
कुणा गरीबाच्या झोपडीवर?
रस्तावर बसलेल्या भिकर्याच्या थाळित कि,
'येरे येरे पावसा' म्हणत सोडलेल्या कागदाच्या होडित?
पण कोठेही पडो
तिचा उद्देश एकच असतो
दुसर्याला निर्मळ बनवन्याचा
दुसर्याला फुलविण्याचा
दुसर्याला आनंद देण्याचा........
मी....
Wednesday, April 8, 2009
वादळाच्या. ...........
"वादळाच्या कुशीतून मी
आताच उठून आलो आहे
गालावरच्या पावसाला एक
वाट करून आलो आहे
निळ्याशार पाण्यात मी
एकच बिंब पाहिले होते
वळून जेव्हा पाहिले तेव्हा
फक्त शब्दच उरले होते
याच किनारी बसून आपण
एक संध्याकाळ रंगवली होती
क्षितिजाला तेव्हा मी
हळूच हुलकावणी दिली होती
एकच साथ हवी होती
सोबत तुझ्या जगण्याची
हातामध्ये हात घेऊन
मॄगजळ पाहण्याची
किनारावर आजही मी
शांत उभा आहे
ओढून मला घेशील
याची वाट पाहत आहे
'आता माझे फक्त, एकच म्हणणे आहे
कधीही मला तू पुन्हा भेटू नकोस'
आता निदान थांबलो आहे
तेव्हा मी थांबणार नाही
माझे जीवन तेव्हा मी
माझ्या हाती ठेवणार नाही
म्हणूनच,
वादळाच्या कुशीतून मी
आताच उठून आलो आहे
गालावरच्या पावसाला एक
वाट करून आलो आहे"
आताच उठून आलो आहे
गालावरच्या पावसाला एक
वाट करून आलो आहे
निळ्याशार पाण्यात मी
एकच बिंब पाहिले होते
वळून जेव्हा पाहिले तेव्हा
फक्त शब्दच उरले होते
याच किनारी बसून आपण
एक संध्याकाळ रंगवली होती
क्षितिजाला तेव्हा मी
हळूच हुलकावणी दिली होती
एकच साथ हवी होती
सोबत तुझ्या जगण्याची
हातामध्ये हात घेऊन
मॄगजळ पाहण्याची
किनारावर आजही मी
शांत उभा आहे
ओढून मला घेशील
याची वाट पाहत आहे
'आता माझे फक्त, एकच म्हणणे आहे
कधीही मला तू पुन्हा भेटू नकोस'
आता निदान थांबलो आहे
तेव्हा मी थांबणार नाही
माझे जीवन तेव्हा मी
माझ्या हाती ठेवणार नाही
म्हणूनच,
वादळाच्या कुशीतून मी
आताच उठून आलो आहे
गालावरच्या पावसाला एक
वाट करून आलो आहे"
Thursday, March 19, 2009
पहा
1. अस्तित्व
स्वप्नांच्या ताठा(टा)त माहीत नाही काय आहे
पहाटेला प्रखराचा निर्सगाचाच शाप आहे
संध्या जरी काळोखात बुडली तरी
खरयाखुरया अस्तित्वाला त्याचीच प्रबळ साथ आहे
2. शाप
जगणे हा एक शाप आहे
मरण्याआधीचा व्याप आहे
भावनांच्या गुंतागुंतीत जिथे
पहिला आणि शेवटचा श्वास माफ आहे
3. निमित्त
आयुष्याच्या सुरवातीलाच
मी आज निकामी ठरलो
साला बाम्ब(bomb)येऊन अंगणात पडला
आणि मी मात्र निमित्त ठरलो
स्वप्नांच्या ताठा(टा)त माहीत नाही काय आहे
पहाटेला प्रखराचा निर्सगाचाच शाप आहे
संध्या जरी काळोखात बुडली तरी
खरयाखुरया अस्तित्वाला त्याचीच प्रबळ साथ आहे
2. शाप
जगणे हा एक शाप आहे
मरण्याआधीचा व्याप आहे
भावनांच्या गुंतागुंतीत जिथे
पहिला आणि शेवटचा श्वास माफ आहे
3. निमित्त
आयुष्याच्या सुरवातीलाच
मी आज निकामी ठरलो
साला बाम्ब(bomb)येऊन अंगणात पडला
आणि मी मात्र निमित्त ठरलो
[मुलाच्या मनातील विचार मांड्ण्याचा प्रयत्न....]
[मुलाच्या मनातील विचार मांड्ण्याचा प्रयत्न....]
नाही गं वेडे.....चुकीचा समज आहे हा
जवळून जर पाहीलंस तर अस्तित्वाचा खेळ आहे हा
डोंगर असो मग.. अश्रुंचे गर स्वप्नांचे
चिंब माझ्या वर्षावाने..डोंगरही फुलवतील त्यातूनही झरे
आज उद्याच्या खेळामध्ये..भविष्यफुले परी उमलतील
विझवलेल्या डोळ्यांचे पाणी..शतपटींनी अंकुर रुजवतील
असेलच जर विश्वास अजूनही..वाट आहे काही क्षणांची
अजून काहीच थेंब थांब..येतोच आहे मी तिथे
तुझ्यामाझ्यातील अंकुराचे, हेच तर राणी रुजणे..
हेच राणी रुजणे
ती
ती अशी आली जीवनात की
डोळे माझे बोलके झाले
तिने हसून डोळे झाकले आणि
आज त्या सूर्यालाही बुडवणे कठीण झाले
क्षुद्र
आज मज आकाश भासे क्षुद्र
सारा आसमंत परी खिशातच माझ्या बंद
त्या तिथल्या ग्रहावरती भेटलाय एक सोबती
माझे सारे उरले क्षण आता त्याच्याच सोबती
....... आता त्याच्याच सोबती
नाही गं वेडे.....चुकीचा समज आहे हा
जवळून जर पाहीलंस तर अस्तित्वाचा खेळ आहे हा
डोंगर असो मग.. अश्रुंचे गर स्वप्नांचे
चिंब माझ्या वर्षावाने..डोंगरही फुलवतील त्यातूनही झरे
आज उद्याच्या खेळामध्ये..भविष्यफुले परी उमलतील
विझवलेल्या डोळ्यांचे पाणी..शतपटींनी अंकुर रुजवतील
असेलच जर विश्वास अजूनही..वाट आहे काही क्षणांची
अजून काहीच थेंब थांब..येतोच आहे मी तिथे
तुझ्यामाझ्यातील अंकुराचे, हेच तर राणी रुजणे..
हेच राणी रुजणे
ती
ती अशी आली जीवनात की
डोळे माझे बोलके झाले
तिने हसून डोळे झाकले आणि
आज त्या सूर्यालाही बुडवणे कठीण झाले
क्षुद्र
आज मज आकाश भासे क्षुद्र
सारा आसमंत परी खिशातच माझ्या बंद
त्या तिथल्या ग्रहावरती भेटलाय एक सोबती
माझे सारे उरले क्षण आता त्याच्याच सोबती
....... आता त्याच्याच सोबती
नाते......
नाते कसे असावे???
प्रश्न तर कठिण आहे....
पण जे कठिण आहे....
त्यालाच तर आपण आधी संपवतो
मग याचे असे का?
का ते लांबचे चंद्र सूर्य जवळचे वाटतात?
कधी चॊथ्या सीटवरचा म्हातारा जवळचा वाटला का...
तेव्हा'भावनांचे नात'नाही का आठवत..
अठराव्या वर्षी मत देतांना भ्रष्टाचाराचा राग आला होता...
पण पासपोर्ट काढतांना तो का गिळून र्निलज्य झालात..
तेव्हा अठरा वर्ष शिकलेलं'तात्विक नातं'नाही का आठवलं..
लहानपणी शाळेत केली होती झाडलोट मनापासून..
पण आता भर रस्त्यात थुंकतांना नाही का लाज वाटत
तेव्हा वर्गमित्रांसोबत घालवलेलं'स्वछतेचं नातं'नाही का आठवत...
म्हटलं तर सगळं सोप्प आहे अनुभवला तर स्वर्ग आहे...
म्हणूनच हल्ली मला नातंच पटत नाही..
आपल्याच घरी कोंबडी पाळूनतिचं मटण खाणं पटत नाही..
तरीही मित्रांनो,
प्रश्न मात्र तसाच राहतो
नाते कसे असावे???
नाते असावे प्रेतासारखे
वाटेत फुलं पसरत जाणारे...
नाते असावे फुलासारखे
तोडल्यावरही तीन दिवस आपल्याला हसवणारे...
आणि नाते असावे वाळवंटासारखे
दिवसा वेगळे आणि रात्री वेगळे वागवणारे...
प्रश्न तर कठिण आहे....
पण जे कठिण आहे....
त्यालाच तर आपण आधी संपवतो
मग याचे असे का?
का ते लांबचे चंद्र सूर्य जवळचे वाटतात?
कधी चॊथ्या सीटवरचा म्हातारा जवळचा वाटला का...
तेव्हा'भावनांचे नात'नाही का आठवत..
अठराव्या वर्षी मत देतांना भ्रष्टाचाराचा राग आला होता...
पण पासपोर्ट काढतांना तो का गिळून र्निलज्य झालात..
तेव्हा अठरा वर्ष शिकलेलं'तात्विक नातं'नाही का आठवलं..
लहानपणी शाळेत केली होती झाडलोट मनापासून..
पण आता भर रस्त्यात थुंकतांना नाही का लाज वाटत
तेव्हा वर्गमित्रांसोबत घालवलेलं'स्वछतेचं नातं'नाही का आठवत...
म्हटलं तर सगळं सोप्प आहे अनुभवला तर स्वर्ग आहे...
म्हणूनच हल्ली मला नातंच पटत नाही..
आपल्याच घरी कोंबडी पाळूनतिचं मटण खाणं पटत नाही..
तरीही मित्रांनो,
प्रश्न मात्र तसाच राहतो
नाते कसे असावे???
नाते असावे प्रेतासारखे
वाटेत फुलं पसरत जाणारे...
नाते असावे फुलासारखे
तोडल्यावरही तीन दिवस आपल्याला हसवणारे...
आणि नाते असावे वाळवंटासारखे
दिवसा वेगळे आणि रात्री वेगळे वागवणारे...
पुन्हा ही एक नवी कविता.......! मैत्रीवर....!
पुन्हा ही एक नवी कविता.......! मैत्रीवर....!
मैत्री.....!
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...
कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण...
आपल्या मैत्रीचे दिवस पंखाखाली घेत,
प्रेमाचे मृगजळ शोधतेयं माझे हे जीवन..
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवनारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.........
माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा,
मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा..
दुःखाच्या चिंब पावसात शोधतोय,
सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा...
सकाळच्या सुर्यासोबत इंद्रधनू घेऊन येणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.....
कोऱ्य़ा माझ्या आयुष्यात मैत्रीचे चित्र तू चितारले,
प्रेमाच्या सप्तरंगात ते चित्रही नाहून निघाले...
पाणावलेल्या डोळ्यांनी आज पुन्हा त्याकडे बघतोय,
तुझ्या आठवणीचा एक रंग त्यात शोधतोय..
जीवनाच्या चित्रपटलावर वेगळेचं रंग रंगवणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी......
मैत्री.....!
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...
कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण...
आपल्या मैत्रीचे दिवस पंखाखाली घेत,
प्रेमाचे मृगजळ शोधतेयं माझे हे जीवन..
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवनारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.........
माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा,
मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा..
दुःखाच्या चिंब पावसात शोधतोय,
सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा...
सकाळच्या सुर्यासोबत इंद्रधनू घेऊन येणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.....
कोऱ्य़ा माझ्या आयुष्यात मैत्रीचे चित्र तू चितारले,
प्रेमाच्या सप्तरंगात ते चित्रही नाहून निघाले...
पाणावलेल्या डोळ्यांनी आज पुन्हा त्याकडे बघतोय,
तुझ्या आठवणीचा एक रंग त्यात शोधतोय..
जीवनाच्या चित्रपटलावर वेगळेचं रंग रंगवणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी......
Wednesday, March 4, 2009
माझं मन.. !!
"mind manifests itself as
the stream of consciousness"
पूस्तकातली व्याख्या घोकून,
जेव्हा पूस्तक बाजूला ठेवलं..
आणि खिडकीतून बाहेर पाहीलं..
चांदण्यांनी भरलेलं आकाश दिसलं..
एकेक चांदणी गलोलीने पाडावी वाटली..
आणि कळलं पुस्तकाच्या व्याख्येच्याही..
पलीकडॆ आहे वेडं मन !!
कधीतरी वाटतं, मोठ्याश्या oysterमध्ये,
वाळूसारखे अलगद शिरलो..
तर आपला पण मोती होईल?
कधी कधी वाटतं..
जगातली सगळी फ़ुलं,
पांघरली ...
नात मैत्रीच
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा कोणी आयुष्य बनत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा त्याच स्वपनात ही येन असत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा घोल्क्यात लक्ष फ़क्त त्याच्या कड़े असत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा मन त्याच्या विचारात रमत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा मैत्री पेक्षा काहीतरी अधिक हव असत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
रोजच्या गप्पांच रूप बदलत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
येताच तो समोर लाजायला होत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
वाचताच ही कविता जेंव्हा कोणीतरी आठवत
होत अस जेंव्हा कोणी आयुष्य बनत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा त्याच स्वपनात ही येन असत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा घोल्क्यात लक्ष फ़क्त त्याच्या कड़े असत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा मन त्याच्या विचारात रमत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा मैत्री पेक्षा काहीतरी अधिक हव असत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
रोजच्या गप्पांच रूप बदलत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
येताच तो समोर लाजायला होत
नात मैत्रीच प्रेमात बदलत
वाचताच ही कविता जेंव्हा कोणीतरी आठवत
Subscribe to:
Posts (Atom)