╰» αвσυт мє

My photo
Mumbai, Maharashtra, India
एकटी स्वप्न माज़ी, मी स्वप्नातही एकटा. एकट्यांची ही गर्दी, या गर्दीत मी एक एकटा......मी स्वप्निल....

Wednesday, December 16, 2009

मनाप्रमाणे जगण्यासाठी वेळच नसतो

मनाप्रमाणे जगण्यासाठी वेळच नसतो
मला, स्वप्नही बघण्यासाठी वेळच नसतो…
वसंत येतो, श्रावण येतो अनेकदा; पण
फुलण्यासाठी, भिजण्यासाठी वेळच नसतो…
ओळख असलेलेच भेटती लोक मला, पण
बघून ‘त्यांना’ हसण्यासाठी वेळच नसतो…
प्रेम कुणीही का माझ्यावर करीत नाही?
प्रेम कुणा का करण्यासाठी वेळच नसतो?…
नशिबी असते जे-जे, घडते ते-ते तेव्हा
नशिबी माझ्या ‘घडण्यासाठी’ वेळच नसतो…
‘अजब’ चालली कशाला पुढे इतकी दुनिया?
कुणास मागे वळण्यासाठी वेळच नसतो..

पडायच असत प्रेमात कधी कधी…..

पडायच असत प्रेमात कधी कधी

बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी..

पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत

विचारात गुंतल्यासारख कधी कधी

अन पाहताना तिच्याकडेच

विचारात गुंतायच असत कधी कधी..

रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच…

जागुन अशी रात्र काढावी कधी कधी

नंतर “जागली होतिस का रात्री?”

म्हणून विचारावे कधी कधी..

मागायचा असतो देवाकडे..

हात तिचा चोरुन कधी कधी

द्यायच असत आश्वासन त्यालाही

पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी..

चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या

विषय तिचा निघाल्यावर कधी कधी

असते रागवायचे लटकेच

“अस काही नाहिये” म्हणून कधी कधी

विरहात तीच्या …

असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी..

पाहुन हात तिचा दुसर्‍या हाती ..

असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी..

पडायच असत प्रेमात कधी कधी

बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी

आठवतोयस तू मला…….. !!

आठवतोयस तू मला…….. !!

आठवतोयस तू मला,
जेव्हा शोधते मी माझ्या काळजाला,
भूलविलेस ज्या क्षणी तू,
आठवताना त्या क्षणाला !!

आठवतोयस तू मला,
रात्री स्वप्ने पाहताना,
झोपेत स्मित करताना,
दचकून जागे होताना !!

आठवतोयस तू मला,
खिडकीतुन चन्द्र पाहताना,
एकांतात पावसाच्या सरी,
अंगावर झेलताना !!

आठवतोयस तू मला,
सुखाचा क्षण अनुभवताना,
मोकळ्या केसात माझ्या,
हात फिरवताना !!

आठवतोयस तू मला,
तुझ्या कविता वाचताना,
डोळ्यातून वाहणारे,
मोती वेचताना !!

आठवतोयस तू मला,
श्वास घेताना,
तू जवळ नसता,
तो अडवून बघताना !!

मी कशी आहे ?

कधी मी वारयाची झुलूक असते
तर कधी बेफाम वारा असते

कधी मी पावसाची हलकी सर असते
तर कधी समुद्रची लाट असते

कधी मी डोलनारे कणिस असते
तर कधी खम्बिर तरु असते

कधी मी शांत नदी असते
तर कधी भिरभिर्नारे फूलपाखरू असते

मी तो सुर आहे

जो मनाला दिलासा देतो,
तर कधी हुरहुर लावतो

बस आणि काय सांगू
सगलच लिहिता येत नाही
म्हनून म्हणते
मी कशी आहे ते मलाच सांगता येत नाही……

गुलाबी कल्लोळ …… !!

गंधाळलेला गुलाब,
माझ्या ओठांवर फुलाला,
मखमली स्पर्शाने त्या,
ओठांचा रंग गडद केला !

चंचल वाराही,
तुला फितूर झालेला,
मला पाहण्यासाठी,
खर तर तू आतुरलेला !

घननिले नभ तुझ्या,
साथीला धावले,
तुझ्या मिठीत मला,
खेचून आणले !

थेम्बाथेम्बाने त्या,
कशी जादू केलि,
तुझ्या माझ्या अंतरी,
सतार छेडूनी गेली !

पाहता तू असे चोरून,
जिव वेडाउन गेला,
तुझ्या मनातला कल्लोळ,
माझ्या डोळ्यात उमटला !!

सोबत

उरलेल्या ह्या श्वासांची शप्पत
साथ तुझी सोडणार नाही
हा पाऊस नसला तरी
माझे बरसणे थाबणार नाही || १ ||
डोळे मिटून घे अन्
घे हा मातीचा सुगंध
त्यातही शेवटी येईल तुला
फ़क्त माझाच मंद गंध || २ ||
तू असे म्हणतोस
की तुझ्या आठवणीवर जगायचेय
माझ्या आठवणी असताना
मला सोबतीला का घ्यायचेय ? || ३ ||
तू नाही आता एकटा
मीही तुझ्या साथीला आहे
मृगजळ नाही तर
माझ्या प्रेमाचा वर्षाव आहे || ४ ||
म्हणुन खरे सांगते तुला
मला हवीय सोबत तुझी
मी आहे फ़क्त तुझी
तू राहशील का माझा ? || ५ ||
तू नव्हतास तेव्हा
“जीवन” माझे होते व्यर्थ
तुझ्या साथीमधेच माझ्या
“जीवनाला” आहे अर्थ || ६ |

तू…

तू अल्लड नदी
की
अवखळ वारा ?
तू राजकुमारी
की
माझी स्वप्न सुंदरी ?
माझ्या हृदयाची देवी
की
स्वच्छंदी सिहांची छावी ?
तू अजाण बालिका
की
चंचल मनाची संचालिका ?
तू शांत सागर
की
तू धगधगते नगर ?
तू प्रेमाची मूर्ति
की
सौंदर्याची अभिजात कलाकृति ?
तू माझी माऊली
की
माझ्या प्रेमाची सावली ?
तू जगण्याची आशा
की
तू कातरवेळची निशा ?
तू यशाचा थंड झरा
की
तू धगधगता निखारा ?
तू मंदिरातील समई मंद
की
तू जीवनातील मुक्त छंद ?
तू पहिल्या पावसाचे थेंब
की
माझे प्रतिबिंब ?

म्हणून तर बघा – I LOVE YOU …

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो

कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात

पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात….

आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं

कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी

म्हणूनच ……..
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर
एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा
” I LOVE YOU ”

कोडे ….

सर्वात सुंदर काय … ?
मैत्रीतले मन ..
का ..
मनातली मैत्री ?
मनात असते तुझीच मैत्री
का ….
तुझ्याच मैत्रीत मन ?
कोडे……..
मनातील तुझे विचार
का …..
तुझ्या विचारांनी भरलेले मन ?
कोडे …..
विचारां मधे फ़क्त तू
का ….
तू म्हणजे फ़क्त विचार ?
कोडे …..
तू म्हणजे मन
का …..
तू म्हणजे मैत्री ?
कोडे…..
तू म्हणजे प्रेम
का
प्रेम म्हणजे तुझी मैत्री ?
कोडे…..

सखे, तुझ्या ओल्या केसात…

सखे, तुझ्या ओल्या केसात
सुरांचा उन्माद असु दे

तुझ्या केसातुन बरसावं… माझ्या शब्दांचं वादळ
त्याला कवितांचा नाद असु दे

तुझ्या रातराणी मेहेफ़िलिनं… छेडावी जीवघेणी गझंल,
माझ्या उध्वस्त जीवाची
…………………….त्याला उन्मुक्त दाद असु दे

तो मोहाचा घोट प्यायला…. मी कधी पासुन आतुर,
तुझ्या अनावर पाशाची
……………………त्याला मनसोक्त साद असु दे

सखे, तुझ्या ओल्या श्वासात
माझा….
…………………….गुलमोहरी श्वास असु दे

तुझ्या देहावर फ़ुलावा….. माझ्या स्पर्शाचा सडा,
तुझ्या मस्तवाल कळ्यांना
……………………..माझ्या मिठीचा वास असु दे

तुझी कातरवेळ असावी….. माझ्या रात्रीला बिलगायला व्याकुळ,
तुझ्या संधी प्रकाशाला सुद्धा
……………………माझ्या विरहाचा भास असु दे

तुझ्या पारीजातकानं झुरावं…….. माझ्या उन्मत्त बहाव्यासाठी,
तुझ्या वसंतातल्या श्रुंगाराला
…………………..माझ्या पानझडीचा ध्यास असु दे

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे…

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे……..

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे……..

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे………

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे…….

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे………..

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सूर त्याचा आणि शब्द माझे असावे

तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही

पहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलो
फक्त तुलाच पहावे असेच दिनक्रम करत राहिलो
खरच तुझ्या नादाने मी स्वता लाच हरवत राहिलो
काय करू प्रेमाचा ताज महल् ला सजवीताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

आज नाहीतर उद्या बोलेन दिवस फक्त जात आहे
कधी येईल ती वेळ त्याचीच वाट पाहत आहे
यशस्वी नक्की होऊ हेच मनाला समजवात आहे
खरच आता तुझ्याशिवाय मला जगताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

दिवस रात्र फक्त तुझाच विचार येत च आहे.
माझी पावले तुझ्याच मागे जातच आहे
हृदयात या माझ्या प्रेमाचे झरे वाहातच आहे
काय करू माझी प्रेमाची धार तुझ्या हृदयात वाहताही येत नाही
बोलताही येत नाही की लपविताही येत नाही

बोलताही येत नाही की लपविताही येत नाही
तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही

अस्तित्त्व --

मनातील शब्दांची फुलपाखरे हळूच कागदावर उतरली
...आणि बघता बघता एक कविता जन्मास आली !
कविता जणू वाटत होती एखाद्या तान्ह्या बाळासारखी
!नुकतीच या अनोळखी जगात पाऊल ठेवलेली,
आपल्या अस्तित्त्वाचा शोध घेणारी ..
.मग वाटू लागली ती एखाद्या नववधू सारखी ,
थोडीशी बावरलेली, थोडीशी संकोचलेली...
आपण लोकांना आवडू की नाही या विचारात रमलेली !
कधी कविता वाटते जवळच्या मैत्रिणी सारखी,
आपल्या सुखात व दुःखात सहभागी होणारी ...
आपल्या भावना समजून घेणारी !
शेवटी प्रत्येक कवितेला असतं एक स्वतःचं व्यक्तिमत्त्व,
ती ही शोधत असते सगळ्यांमध्ये आपलं वेगळं अस्तित्त्व --

सावन बरसे... बिना भिगायें

सिनेमात पाऊस येतो, तेव्हा हीरोइनला पारदर्शक कपड्यात भिजवणं दिग्दर्शकाला खूप आवडतं. राज कपूर, यश चोप्रा यांची तर ही खास आवड. पण अनेक सिनेमांमध्ये अशी अनेक गाणी आहेत जी पावसाची आहेत, पण त्यात हीरोइनला अजिबात भिजवलेलं नाही. तरीही ही गाणी पाऊस पडला की हमखास आठवतात.

.........

सिनेमात पावसाचं गाणं नाही, मग तो हिंदी सिनेमाच नाही. हीरो-हीरोइन यांच्यातल्या प्रेमातला एकमेव साक्षीदार असतो तो पाऊस. पावसात भिजत प्रियकराची मनधरणी करणारी हीरोइन आपण खूपदा पाहिली आहे. प्रेमी जिवाला प्रेमाचं भरतं आलं की हमखास पाऊस पडायला हवा असतो. पण अनेक सिनेमांमध्ये अशी गाणी असतात. ज्या गाण्यात पाऊस असतो पण पडद्यावर मात्र अजिबात पडत नसतो. तरीही पावसाची गाणी म्हटलं की, अशी गाणी आठवायला लागतात.

' जब वी मेट' या सिनेमात 'तुमसे ही दिन होता है...' या गाण्यात पाऊस पडतो. त्या गाण्यात पिवळ्या छत्रीत करिश्मा काळ्या ड्रेसमध्ये बिनधास्त नाचते आणि शाहिद कपूर ड्रायव्हरने ऑफर केलेली छत्री बाजूला सारून नाचतो. याच सिनेमात शास्त्रीय गायक राशीद खान यांच्या आवाजातलं 'आओगे जब तुम वो साजना' हे गाणं आहे. गाण्यातली सिच्युएशन पावसाची अजिबात नाही पण, 'बरसेगा सावन अंगना फूल खिलेंगे' असं म्हणत पावसाच्या येण्याची प्रफुल्लता प्रियकराच्या येण्याइतकीच आनंददायी असते, हे सांगून टाकते.

' युवा' सिनेमात अदनान सामी आणि अलका याज्ञिकने गायलेलं एक सुरेख गाणं आहे. त्या गाण्याची सिच्युएनही पावसाची नाही आणि पावसाचं गाणं नाही. पण तरीही त्यात पाऊस आहे.

बादल वो आये, आये

गमीर् बढ़ाये, हाये

पानी भी लाये

उसकी मर्जी

असं म्हणत पावसाचा लहरीपणा माणसाचाही स्थायी भाव दाखवून देतो. 'इन दिनो' हे 'लाइफ इन मेट्रो' सिनेमात पाऊस खूप छान कॅरेक्टर म्हणून येतो. 'दस' सिनेमात हरिहरनच्या आवाजातलं एक अप्रतिम गाणं आहे. सिनेमातल्या अॅक्शन आणि 'दस बहाने करके ले गया दिल' या गाण्यामुळे त्या गाण्याकडे जरा दुर्लक्षच झालं. 'बंद आखो से तूम आज तूम को देखले' या गाण्यात पाऊस आणि भावना या किती सारख्या असतात, हे सांगतात कवीचा अंदाज खूप शायराना झाला आहे.

ये किस लिए इन आखों मे

सिसक रही है बारीशे

आणि मग

बूंद बूंद छलके टपके

बरसे मेरा मन

भीग भीग जाये

भीगेे होठ से सावन

अशा शब्दांमध्ये पाऊस पडतो. अर्थात, मठ्ठ चेहऱ्याचा सुनील शेट्टी आणि इशा देओल यांनी कितीही ठरवलं असतं तरी या शब्दातल्या भावना खचितच पडद्यावर दाखवता आल्या असत्या. कदाचित हे गाणं लोकांच्या स्मरणात न राहण्याचं तेही एक कारण असावं.

' बॅण्डिट क्वीन' नावाचा सिनेमा. फुलनदेवीच्या आयुष्यावरचा. सिनेमातली अनेक दृश्यं आपल्या अंगावर येणारी. याच सिनेमात एक पावसावरचं अप्रतिम गाणं आहे. अर्थात, त्यात पाऊस मात्र नाही. फुलनच्या आयुष्यातल्या एकमात्र सुखाचा क्षण चित्रित करताना बॅकग्राउण्डला हे गाणं वाजतं. उस्ताद नुसरत फतेह अली खान यांनी गायलेलं गाणं तब्बल आठ मिनिटांचं आहे.

कामधंद्यासाठी परदेशी गेलेल्या पतीला उद्देशून लोकगीताच्या ओळी आधी कोरसमध्ये येतात.

सावन आया रिमझिम सावरे

आये बादल कारे कारे

मतवारे प्यारे प्यारे

मोरे अंगना झूमके

घिर घिर आयी उड़ी उड़ी

देखो मस्त घटाये

फुर फुर आज उड़ाये आँचल

मोरा सर्द हवाये...

अशा शब्दांमधून पावसापूवीर्चं मस्त ढगाळ वातावरण अनुभवता येतं. आणि नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजात 'मोरे सैया तो है परदेस मै क्या करू सावन को, सुना लागे सजन बिन देस... असं म्हटल्यावर पावसात आपल्या प्रिय व्यक्तीचा विरह किती जीवघेणा असतो, याची जाणीव होते.

' सत्या' हा अण्डरर्वल्ड या विषयावरचा सिनेमा. या सिनेमात 'गिला गिला पानी' असं पावसावरचं चिंब चिंब भिजवणारं गाणं आहे. ऊमिर्ला मातोंडकरला कॉटन साडीत भिजवण्याचा मोह रामूला या गाण्यात आवरला नव्हता. याचं सिनेमात भूपेंदने खूप वर्षांनी एक गाणं गायलं. 'बादलो से काट काट के...'. या गाण्यात गुलाार लिहून जातो,

एक बार तुमको जब

बरसते पानियो के पार देखा था

यू लगा था जैसे

गुनगुनाता एक आबसार देखा था

तबसे मेरी नींद में बरसती रहती है...

संजय लीला भन्साळीच्या '१९४२ अ लव स्टोरी' सिनेमात पावसाचं अप्रतिम गाणं आहे. 'रिमझिम रिमझिम....' पिवळ्या साडीत गोड दिसणारी मनीषा कोईराला आणि अनिल कपूर यांना अजिबात न भिजवता हे गाणं चित्रित केलं आहे. तर अगदी अलीकडच्या 'थोडा मॅजिक थोडा प्यार'मध्ये 'सिधी सपाट जिंदगी...' या गाण्यात

कभी सोचा है क्या, बारीश क्यू भाये

क्यू गीत बेवजह, होंठो पे आये

हा पाऊस आपल्याला गाणं लिहायला भाग पाडतो, असं प्रसून जोशी सांगून टाकतो.

हवाहव्याशा वाटणाऱ्या पावसाची अनेक गाणी आहेत. पण कोणालाही न भिजवता आपल्या चिंब करणारी गाणीही खूप आहेत. फक्त जरा कान देऊन ती ऐकायला हवी इतकंच.

हल्ली डोळे मिटल्यावरही दिसतेस!

प्रेम विवाहाच्या मी अगदी विरुध्द आहे,
कारण गुणांपर्यत ठीक आहे,
दोष कळले की ते एक न संपणरं युध्द आहे!
तु कौलेजला आलीस कीमाझी नजर तुझ्यावर
खिळतेत्यातुनच पुढचं आयुष्य जगायचीस्फुर्ती मला मिळते!
तु इतकी सुंदर आहेस कीकुणाचही तुझ्यावर
प्रेम बसेलखुप भाग्यवान ठरेल तोज्याच्यावर
तुझं प्रेम बसेल!प्रेमे मिळणं ही सुध्दाएक कला
आहे,पण मी प्रेम मिळवु शकलो नाहीयाचं दु:ख मला आहे!
शाळेत मुलीच्या बाजुला बसणंही आमच्यावेळी शिक्षा होती
आज कुणीतरी बाजुला बसावंही माझी छोटीसी अपेक्षा होती!
चारोळ्या लिहिताना डोळ्यासमोरनेहली फक्त तु असतेस,
तेंव्हा तर डोळे उघडे असतात,पण हल्ली डोळे मिटल्यावरही दिसतेस!

एक प्रवास मैत्रीचाजश्या

एक प्रवास मैत्रीचाजश्या
हळुवार पावसाच्या सरींचाती पावसाची सर
अलगद येवुन जावीअन
एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..
एक प्रवास सहवासाचाजणु अलगद पडणार-या
गारांचान बोलताही बरच काही सांगणाराअन
स्पर्श न करताही मनाला भिडणारा..
एक प्रवास शुन्याचाजणु हीमालयाशी भिडण्याचाशुन्यातुन
नवे जग साकारणाराअन
नव्या निर्मितीची चाहुल देणारा..
एक प्रवास जगण्याचाक्शणा क्शणाला
माणुस घडवण्याचाहसता हसता रडवणाराअन
रडवुन हळुच हसवणारा..
एक प्रवास प्रेमाचाभुरभुरणार-या
दोन जिवांचाजिंकलो तर संसार मांडायचाअन हरलो
तर नवीन वाटा शोधायच्या..
एक प्रवास प्रयत-नांचासुख़ दुख़ातील नाजुक
क्शणांचाअखंड घडवणार-या माणुसकीचाअन
नवी उमेद देणार-या घडींचा..एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचासाठवु म्हंटले
तर साठवणींचाआठवु म्हंटले तर आठवणींचा.
""लाख क्षण अपूरे पडतातआयुष्याला दिशा देण्यासाठीपण,
एक चुक पुश्कळ आहेते दिशाहीन नेण्यासाठी,,,,,,,,,,,,,,,,!
किती प्रयास घ्यावे लागतातयशाचं शिखर चढण्यासाठीपण,
जरासा गर्व पुरा पडतोवरुन खाली गडगडण्यासाठी,,,,,,,,,,,,!
देवालाही दोष देतो आपणनवसाला न
पावण्यासाठीकितींदा जिगर दाखवतो आपणइतरांच्या मदतीला धावण्यासाठी,,,,,,,,,!
किती सराव करावा लागतोविजश्रीवर नाव कोरण्यासाठीपण,
जरासा आळस कारणीभूत ठरतोजिंकता जिंकता हरण्यासाठी,,,,,,,!
कितीतरी उत्तरं अपुरी पडतातआयुष्याचं गणित सुटण्यासाठीकितीतरी
अनुभवातनं जावं लागतंआयुष्य कोडं आहे पटण्यासाठी,,,,,,,,,!
विश्वासाची ऊब द्यावी लागतेनात्याला जिवनभर तारण्यासाठीएक
अविश्वासाचा दगड सक्षम आहेते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी.""

घोंघावणारा वारा

घोंघावणारा वारा
तुला - मला वेडावत होता
आणि किना-याच्या पाण्याने
स्व:ताच बेभान होत होता

त्याच पाण्याने तुझं
माझ्याशी गुढ संवाद साधणं
आणि झटकन जवळ येऊन
तु मला बिलगणं
मी स्वासात कंठ रोखुन
फक्त तुझ्याकडे पहात होते
हे स्वप्न की सत्य
माझे मलाच उमगत नव्हते

नाही म्हटलं तरी तु मला
तुझंच करुन टाकलं होतं
पण फेसाळणा-या लाटांनी
हे गुपित मला सांगितलं होतं
--
--
--
Best Regards,
$W@P

खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ...

खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ...

काट्या वरुन चालताना एकदा हसुन बघ,
आपल्या विरहातिल गेलेले क्षण एकदा मोजुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

गळुन पडलेल्या झाडाच्या एका-एका पाना कडे बघ,
जीव लावून जगवलेल्या झाडाला एकदा मरताना बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

जीवनात मिळालेल्या सुख-दुःखाची बेरीज करुन बघ,
बाकी काहीच उरले नाहि याचा अंदाज घेवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

मुसळधार पावसात विस्कटलेल्या घराकडे बघ,
माझ्या जीवनरुपी आकशात दुःखाच्या विजेचा तांडव एकदा बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

स्वतःच्या जिवंतपणी मॄत्युला डोळ्या समोर बघ,
तो हि लवकर येत नाहि म्हणुन खंत करणाऱ्या माझ्या मनाकडे बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

खरंच तुझ्या प्रेम भंगाने मी किती तुटुन पडले आहे हे समजण्या साठि...
एकदा माझ्यावर मनापासुन खरे प्रेम करुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

प्रेम भंगाने मला लागलेल्या झळा एकदा तु पण अनुभवून बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,
खरचं एकदा माझ्या सारख तु पण जगुन बघ,

कशी असते आई..?

कशी असते आई..?

कोणी सांगेल का मला कशी असते आई..?
लाखोंच्या लेखनातुन ऎकली आहे तिची पुन्याई

कोणी सांगेल का मला कशी असते आई..?
अनुभवायची आहे मला,
शांत झोपे साठि हवी असनारी तिची गोड अंगाई,

कोणी सांगेल का मला कशी असते आई..?
अनुभवायची आहे मला,
माझ्या आजारपणात तिची होनारी घाई,

कोणी सांगेल का मला कशी असते आई..?
अनुभवायची आहे मला,
तिच्या सोबत बागेत फुलनाऱ्या जाई आणि जुई,

कोणी सांगेल का मला कशी असते आई..?
अनुभवायची आहे मला,
मायेचा घास भरवताना चिऊ-काऊ सोबत होणारी तिची बोलनी,

कोणी सांगेल का मला कशी असते आई..?
अनुभवायची आहे मला,
माझ्या खट्याळपणात मारावी अशि चापटी,

कोणी सांगेल का मला कशी असते आई..?
अनुभवायची आहे मला,
कधिही न मिळालेली प्रीति,

कोणी सांगेल का मला कशी असते आई..?
अनुभवाय्ची आहे मला अशी सुखाची शिदोरी..?

खरच कोण सांगेल का मला कशी असते आई..??

निवडक चारोळ्या तुमच्या साठि..

मित्र हो!
माझ्या प्रेमाची मला,
परतफ़ेड मिळाली आहे,
मी गुन्हेगार नसतानाही,
त्याची पुरेपुर शिक्षा मी भोगली आहे.

त्याच्या साठि आज चारोळ्या लिहिल्या,
माझ्या मनाची अवस्था समजेल म्हणुन,
त्या प्रसिद्धिला आणल्या,
त्याने मात्र त्या आजवर नाहि वाचल्या.

आमच्या प्रेमाच्या साक्षिला सुरुच्या बागा होत्या,
समुद्राच्या ठिकाणी जाणाऱ्या नागमोडी वाटा होत्या,
मंदिरातली अबोल देवाची मुर्ति होती,
न पाहीलेलि अशी दुरवर विसावलेली आमची मने होती.

आज तो आहे नामवंत हुद्यावर,
ओळख देवू शकत नाही मी त्याची यावर,
तो आहे आज खुप सुखांवर,
पण तो मागे आहे आज प्रेमाच्या मुद्यावर.

खरचं प्रेमात मी खुप काही हरवल आहे,
माझं शिक्षण-माझी नोकरी,
सुखाचे दिवस सोनेरी,
उरली फ़क्त चारोळीच्या रुपातुन मिळणारी शांती.

आज तो माझ्या प्रत्येक श्वासात आहे,
त्याच्या आठवणी माझ्या ह्र्दयाचा भाग आहे,
माझ्या कवितांत तोच आहे,
दुसरे कुठे काय आहे?

तुम्हाला सांगु,
माझ्या चारोळ्या प्रेमाची अखंड गाथा आहे,
खऱ्या प्रेमात किती भोग आहे,
या साऱ्याचीच ती खरी व्यथा आहे.

माझ्या चारोळ्यात मी माझ आयुष्य उतरवलं,
शब्दांच्या गुंफ़नातुन त्याला सजवलं,
त्याच्या विरहानेच मला आज,
कवयित्रि बनवलं.

त्याला अभिमान होता स्वत:च्या रुपावर,
स्वत:च्या तल्लख बुद्धीवर,
मला अभिमान होता माझ्या लेखणीवर,
जे त्याचे आयुष्य एकदा तरी,
कागदावर उतरवेल यावर.

Thursday, July 30, 2009

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
मांडायचा प्रयत्न करतोय
पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत
आज एक बार सबसे मुस्करा के बात करो
बिताये हुये पलों को साथ साथ याद करो
क्या पता कल चेहरे को मुस्कुराना
और दिमाग को पुराने पल याद हो ना हो

आज एक बार फ़िर पुरानी बातो मे खो जाओ
आज एक बार फ़िर पुरानी यादो मे डूब जाओ
क्या पता कल ये बाते
और ये यादें हो ना हो

आज एक बार मन्दिर हो आओ
पुजा कर के प्रसाद भी चढाओ
क्या पता कल के कलयुग मे
भगवान पर लोगों की श्रद्धा हो ना हो

बारीश मे आज खुब भीगो
झुम झुम के बचपन की तरह नाचो
क्या पता बीते हुये बचपन की तरह
कल ये बारीश भी हो ना हो

आज हर काम खूब दिल लगा कर करो
उसे तय समय से पहले पुरा करो
क्या पता आज की तरह
कल बाजुओं मे ताकत हो ना हो

आज एक बार चैन की नीन्द सो जाओ
आज कोई अच्छा सा सपना भी देखो
क्या पता कल जिन्दगी मे चैन
और आखों मे कोई सपना हो ना हो

क्या पता
कल हो ना हो ...
एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल...
शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच
रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते...?
मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे.........
मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे
चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो,

गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो....

सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं,

अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं....

सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे,

त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे....

आपलं नातं कायम राहो हीच एक सदिच्छा,

जीवनातील प्रत्येक क्षणासाठी तुला खूप शुभेच्छा!!...
ठाऊक आहे,आज मी मावळतीचा अंधार असेल
पण उद्याला मी उगवतीचा सुर्यनारायण होणारचं


आज मी एवलूसा भिरभिरणारा पतंग असेल
पण उद्याला उत्तुंग यशाची भरारी घेणारा गरुड होणारचं

आज मी वळवाचा अवेळी बरसणारा पाऊस असेल
पण उद्याला धो-धो कोसळणारा हस्त नक्षत्राचा वरूण होणारचं

आज मी असेल आडखळणारा उंचवटा पायवाटेचा,
पण उद्या अभेद्य असा हिमालय पर्वत होणारचं..

आज मी असेल दिनरात राबंणार जनावर मुकं
पण उद्या मी गरजणारा सिंह होणारंच..

आज असेल मी एक तारा अदृष्यातला
पण उद्याला दिशादर्शक शुक्रतारा होणारचं


आज असेल मी एकटा या जगात
पण उद्याला तुम्हाला घेवून उडणारा एकीचा थवा होणारचं.. .......
एक छानशी गोष्ट !

एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा ?

दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या

मानसपित्याकडे- ब्र्म्हदेवाकडे गेले. ब्र्म्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही

ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो". दोघेही परत आले.

स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले

गेले होते. सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु

शकले नाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही. थकुन परत एकदा ते

ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या

दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असअतो. खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला

सत्याच्या खांद्यावर उभे रहयला हवे !."
शब्द म्हणजे काय असते ?
ओघळणारा झरा असते
सळसळणारा वारा असते
शब्द म्हणजे असतो डोंगर
कधी सुगंधी माती असते

शब्द म्हणजे प्रेम असते
शब्द म्हणजे माफ़ी असते
शब्द म्हणजे आठवणींची
भरलेली टाकी असते

शब्द कधी असती सुंदर
कधी हृदयास भिडनारे
शब्द असती रडता-रडता हसवणारे
शब्द असती हळूच जग दाखवनारे

शब्द म्हणजे असते न्यान
शब्द म्हणजे असते शान
शब्दामध्येच मोजले जाते
तुझ्या माझ्या अकलेचे परिमाण

शब्द कधी असती प्रेमळ
शब्द कधी बनती कठोर
शब्द कधी असती बोलके
शब्द कधी असती तुटके
शब्दामध्येच सामावली असतात
तुझी माझी सुख-दू:खे

शब्द म्हणजे काय असते ?
खरे सांगू ?
शब्दामध्ये दडलेल्या भावनाशिवाय
शब्द म्हणजे काहीच नसते
आणि हे समजुन घे माझ्या मित्रा
शब्दान्विनाही जग असते .

Monday, May 18, 2009

प्रेम प्रेम अन् प्रेमच…….

प्रेम प्रेम अन् प्रेमच…….
गाईचे वासरावरती असते ते प्रेम………
चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम………
आईचे मुलांवर असते ते प्रेम………
नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम………
अन् प्रियकराचे प्रेयसीवर व प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच……..
प्रेमाचे प्रकार तसे अनेकच,
पण त्याच्या मागील भावना मात्र एकच…..
आजच्या जीवनात खरे प्रेम तसे क्वचितच मिळते…
खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!
तर….

खरे प्रेम असावे…..
कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही….

खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही….

खरे प्रेम असावे…..
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणारे…..

खरे प्रेम असावे…..
पैशाने विकत न घेता येण्यासारखे,
वेळ आलीच तर पैशालाही झुकवण्यासारखे……

कारण…..

प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही……

एकच वेळ …!!


एकच वेळ …!!

मी तर केवळ दयेचा सागर
लोटा भर-भर वाहून घे ..
मी तर केवळ मायेचा सागर
एक डुबकी तरी मारून घे …!!

मी तर केवळ प्रकाश ज्ञानाचा
एकच अंधकार लावून घे
मी तर केवळ क्षणाचा भुंगर
एकदा तरी पाहून घे ..!!

मी तर केवळ प्रभूचा दास
एकच वेळ एइकून घे ..
तू तर आहे दासाचा दास
एकच वेळ ओळखुन घे ..!!

मी तर आहे भविष्याचा मार्ग
एकच वेळा चालून घे ..
मी तर आहे भूतांचा भुत
एकच वेळ जानूं घे …!!

मी तर आहे पाण्याचा झोत
एकच वेळ पिवून घे
मी तर आहे जीवनाचा मौत
एकच वेळ जगुन घे ..!!

मी तर आहे परमात्म्याशी समरूप
एकच वेळ उपकारून घे ..
मी तर आहे जादूचा चिराग
एकच वेळ फुकमारून घे …!!

समजुन घे मला…..


समजुन घे मला…..
तुझ्याकडे आता काही मागणे नाही…..
मन माझ तुझ्याकडे…
आता हास्य ही माझ नाही…
रिती ओन्जळ माझी…
दोन फुल ही आपली तुझ्याचकडे
बरसलेला श्रावण
आता कोरडी असलेली जमिन
सगळ तुझ्याचकडे……..

कधी तरी वळुन विचारीन मी तुला
सम्भाळुन ठेव…… माझी हि ठेव सारी
शेवटच समजुन घे मला……
तुझ्याकडे आता काही मागणे नाही…..

* मला तुला


मला तुला

जमल नाही मला, तुला विसरायला
जमल नाही तुला, आठवायला मला

कळल नाही मला, तुझ स्वार्थ जतन
कळल नाही तुला, माझ पवित्र मन

पटल नाही मला, तुझ फसवण
पटल नाही तुला, माझ केवळ प्रेम

ऐकल नाही मी, कधीच दुसर्यांच
ऐकल नाहीस तु, कधीच माझ

वळल नाही माझ, पाउल दुसरीकडे
वळल नाही तुझ, पाउल माझियाकडे

कंट्रोल+ अल्ट + डिलीट


कंट्रोल+ अल्ट + डिलीट

मला आठवत तु म्हटल होतस
वेगळे होवुया….
नको असलेल्या नात्याच
ओझ आता नको उचलुया….
किती सहज … चेह-यावरची रेष न हलवता….
बघत राहीले तुला क्षणभर….
अन चांदण्याच दिसल्या मला भर दुपारी…
काहीच कळेना…तु शांत काही रीअक्ट न होता
अन मग सारे सोपस्कार… कागदोपत्री
कुठलाही वाद नाही… प्रश्न नाही
शोधत राहीले मी उत्तरे न विचारलेल्या प्रश्नांची….

आज परत एकदा ..तु ..मी समोरासमोर….
आज तुला मी हवेय…. का???
एकटेपण सहन होत नाही…..
की शरीराची भुक संपत नाही…

विसरले नाही मी तुझ ते बोल…
आठवत तरी का तुला ते अंधुकस..???
येस…. आज मी तुला तेच सांगतेय….
”मी तुला केलय माझ्या जिवनातुन
कंट्रोल+ अल्ट + डिलीट!!! ”

Monday, April 27, 2009

मी परतणारा..

सुखस्पर्शी लाटा अविरत वारा
अफाट जल अथांग
आणी हा समुद्रकिनारा

भावनांचा उद्रेक कधी उदासीनतेचा मारा
मनी आठवणींचे काहुर
आणी पारवा भिरभिरणारा

एकांताचा खडक विचारांचा झरा
कल्लोळ दाटलेला
आणी माझ्यातला मी तळमळणारा

मिटलेले ओठ डोळे पाणावले जरा
भरुन येई ऊर
आणी सुर्य मावळणारा

मन शांत होईपर्यंत बसे मी त्या समुद्रकिनार्‍यापाशी
तो विचारे मग मला, येशील ना रे उद्या?
आणी मी परतणारा..

मैत्री असावी .........

मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...

कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण...
आपल्या मैत्रीचे दिवस पंखाखाली घेत,
प्रेमाचे मृगजळ शोधतेयं माझे हे जीवन..
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवनारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी

Wednesday, April 22, 2009

मला खुपदा प्रश्न पडतो...........

मला खुपदा प्रश्न पडतो
आयुष्य कसं असतं?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या तळ्यासारखं
कुणीही यावं, एखादा दगड टाकुन जावं
दगड टाकणारा निघुन ज्जतो,
पाण्यात खळबळ माजवुन जातो,
अशा वेळेस काय करावं?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या लाकडासारखं
कुणीही यावं, एखदी ठिणगी टाकुन जावं
वाळ्लेलं असेल तर जाळ होतो नाहीतर .
नुसताच धुर ओल्या लाकडाचा
अशा वेळेस काय करावं?

कधी कधी वाटतं,
आयुष्य असतं एखाद्या प्याद्या सारखं
आपला रस्ता फक्त सरळ असतो
पण त्यात कुणीही मधे येतो,
हत्ती, घोड, वजिर अणि कधी कधी राजा सुध्धा
मागेही वळता येत नाही,
अशा वेळेस काय करावं?

पण मला वाटतं...
आयुष्य कसं असावं?
ढगातुन पडणार्‍या पावसाच्या सरी सारखं
तिला कुणीही अडवु शकत नाही
तिला कुणीही जाळु शकत नाही
एकदा वरुन खाली झोकुन दिल्यावर
तिला माहित नसतं, आपण कुठे पडणार आहोत
शेतातल्या काळ्या मातीवर की,
शहरातल्या डाबंरी रस्तावर
कुणा धनिकाच्या रौक गार्डनवर वर कि
कुणा गरीबाच्या झोपडीवर?
रस्तावर बसलेल्या भिकर्‍याच्या थाळित कि,
'येरे येरे पावसा' म्हणत सोडलेल्या कागदाच्या होडित?

पण कोठेही पडो
तिचा उद्देश एकच असतो
दुसर्‍याला निर्मळ बनवन्याचा
दुसर्‍याला फुलविण्याचा
दुसर्‍याला आनंद देण्याचा........

मी....

Wednesday, April 8, 2009

वादळाच्या. ...........

"वादळाच्या कुशीतून मी
आताच उठून आलो आहे
गालावरच्या पावसाला एक
वाट करून आलो आहे

निळ्याशार पाण्यात मी
एकच बिंब पाहिले होते
वळून जेव्हा पाहिले तेव्हा
फक्त शब्दच उरले होते



याच किनारी बसून आपण
एक संध्याकाळ रंगवली होती
क्षितिजाला तेव्हा मी
हळूच हुलकावणी दिली होती

एकच साथ हवी होती
सोबत तुझ्या जगण्याची
हातामध्ये हात घेऊन
मॄगजळ पाहण्याची

किनारावर आजही मी
शांत उभा आहे
ओढून मला घेशील
याची वाट पाहत आहे

'आता माझे फक्त, एकच म्हणणे आहे
कधीही मला तू पुन्हा भेटू नकोस'

आता निदान थांबलो आहे
तेव्हा मी थांबणार नाही
माझे जीवन तेव्हा मी
माझ्या हाती ठेवणार नाही

म्हणूनच,
वादळाच्या कुशीतून मी
आताच उठून आलो आहे
गालावरच्या पावसाला एक
वाट करून आलो आहे"

Thursday, March 19, 2009

पहा

1. अस्तित्व
स्वप्नांच्या ताठा(टा)त माहीत नाही काय आहे
पहाटेला प्रखराचा निर्सगाचाच शाप आहे
संध्या जरी काळोखात बुडली तरी
खरयाखुरया अस्तित्वाला त्याचीच प्रबळ साथ आहे

2. शाप
जगणे हा एक शाप आहे
मरण्याआधीचा व्याप आहे
भावनांच्या गुंतागुंतीत जिथे
पहिला आणि शेवटचा श्वास माफ आहे



3. निमित्त
आयुष्याच्या सुरवातीलाच
मी आज निकामी ठरलो
साला बाम्ब(bomb)येऊन अंगणात पडला
आणि मी मात्र निमित्त ठरलो

[मुलाच्या मनातील विचार मांड्ण्याचा प्रयत्न....]

[मुलाच्या मनातील विचार मांड्ण्याचा प्रयत्न....]
नाही गं वेडे.....चुकीचा समज आहे हा
जवळून जर पाहीलंस तर अस्तित्वाचा खेळ आहे हा
डोंगर असो मग.. अश्रुंचे गर स्वप्नांचे
चिंब माझ्या वर्षावाने..डोंगरही फुलवतील त्यातूनही झरे
आज उद्याच्या खेळामध्ये..भविष्यफुले परी उमलतील
विझवलेल्या डोळ्यांचे पाणी..शतपटींनी अंकुर रुजवतील
असेलच जर विश्वास अजूनही..वाट आहे काही क्षणांची
अजून काहीच थेंब थांब..येतोच आहे मी तिथे
तुझ्यामाझ्यातील अंकुराचे, हेच तर राणी रुजणे..
हेच राणी रुजणे



ती
ती अशी आली जीवनात की
डोळे माझे बोलके झाले
तिने हसून डोळे झाकले आणि
आज त्या सूर्यालाही बुडवणे कठीण झाले

क्षुद्र
आज मज आकाश भासे क्षुद्र
सारा आसमंत परी खिशातच माझ्या बंद
त्या तिथल्या ग्रहावरती भेटलाय एक सोबती
माझे सारे उरले क्षण आता त्याच्याच सोबती
....... आता त्याच्याच सोबती

नाते......

नाते कसे असावे???
प्रश्न तर कठिण आहे....
पण जे कठिण आहे....
त्यालाच तर आपण आधी संपवतो
मग याचे असे का?
का ते लांबचे चंद्र सूर्य जवळचे वाटतात?
कधी चॊथ्या सीटवरचा म्हातारा जवळचा वाटला का...
तेव्हा'भावनांचे नात'नाही का आठवत..


अठराव्या वर्षी मत देतांना भ्रष्टाचाराचा राग आला होता...
पण पासपोर्ट काढतांना तो का गिळून र्निलज्य झालात..
तेव्हा अठरा वर्ष शिकलेलं'तात्विक नातं'नाही का आठवलं..
लहानपणी शाळेत केली होती झाडलोट मनापासून..
पण आता भर रस्त्यात थुंकतांना नाही का लाज वाटत
तेव्हा वर्गमित्रांसोबत घालवलेलं'स्वछतेचं नातं'नाही का आठवत...
म्हटलं तर सगळं सोप्प आहे अनुभवला तर स्वर्ग आहे...
म्हणूनच हल्ली मला नातंच पटत नाही..

आपल्याच घरी कोंबडी पाळूनतिचं मटण खाणं पटत नाही..
तरीही मित्रांनो,
प्रश्न मात्र तसाच राहतो
नाते कसे असावे???
नाते असावे प्रेतासारखे
वाटेत फुलं पसरत जाणारे...
नाते असावे फुलासारखे
तोडल्यावरही तीन दिवस आपल्याला हसवणारे...
आणि नाते असावे वाळवंटासारखे
दिवसा वेगळे आणि रात्री वेगळे वागवणारे...

पुन्हा ही एक नवी कविता.......! मैत्रीवर....!

पुन्हा ही एक नवी कविता.......! मैत्रीवर....!
मैत्री.....!

मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...

कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण...
आपल्या मैत्रीचे दिवस पंखाखाली घेत,
प्रेमाचे मृगजळ शोधतेयं माझे हे जीवन..
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवनारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.........


माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा,
मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा..
दुःखाच्या चिंब पावसात शोधतोय,
सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा...
सकाळच्या सुर्यासोबत इंद्रधनू घेऊन येणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.....

कोऱ्य़ा माझ्या आयुष्यात मैत्रीचे चित्र तू चितारले,
प्रेमाच्या सप्तरंगात ते चित्रही नाहून निघाले...
पाणावलेल्या डोळ्यांनी आज पुन्हा त्याकडे बघतोय,
तुझ्या आठवणीचा एक रंग त्यात शोधतोय..
जीवनाच्या चित्रपटलावर वेगळेचं रंग रंगवणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी......

Wednesday, March 4, 2009

माझं मन.. !!

"mind manifests itself as
the stream of consciousness"
पूस्तकातली व्याख्या घोकून,
जेव्हा पूस्तक बाजूला ठेवलं..
आणि खिडकीतून बाहेर पाहीलं..
चांदण्यांनी भरलेलं आकाश दिसलं..
एकेक चांदणी गलोलीने पाडावी वाटली..
आणि कळलं पुस्तकाच्या व्याख्येच्याही..
पलीकडॆ आहे वेडं मन !!

कधीतरी वाटतं, मोठ्याश्या oysterमध्ये,
वाळूसारखे अलगद शिरलो..
तर आपला पण मोती होईल?
कधी कधी वाटतं..
जगातली सगळी फ़ुलं,
पांघरली ...

नात मैत्रीच

नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा कोणी आयुष्य बनत

नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा त्याच स्वपनात ही येन असत

नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा घोल्क्यात लक्ष फ़क्त त्याच्या कड़े असत

नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा मन त्याच्या विचारात रमत

नात मैत्रीच प्रेमात बदलत
होत अस जेंव्हा मैत्री पेक्षा काहीतरी अधिक हव असत

नात मैत्रीच प्रेमात बदलत
रोजच्या गप्पांच रूप बदलत

नात मैत्रीच प्रेमात बदलत
येताच तो समोर लाजायला होत

नात मैत्रीच प्रेमात बदलत
वाचताच ही कविता जेंव्हा कोणीतरी आठवत

| माझे माऊली !

भरल्या जखमेवरची खपली
काढावीस असेच तू
जिवघेणे बोललीस अन्
मनाचा कोपरा ढासळला !

गच्च भरले घर
पाखराने एक एक पंख
गाळावे तसे
विलग झाले,
तू सारवलेली भुई माती लिंपल्या भिंती
सगळच कसं दुरावलं
आता तू माझ्यावर सगळा
भार टाकून
सतीच्या व्रुन्दावनापाशी
जाऊन बसू नकोस !


परंपरांचे ओझे अन्
संस्काराचे जोखड वागवत
तू काळ्याचे पांढरे केलेस,
कुंकू हरविले तरी तू
अबीर कपाळी लावून
विठ्ठलाला आळवत राहिलीस
माझे माऊली ! माझे माऊली !

तुला एकच सांगतो
मला माझ्या वाटे चालू दे !
वांझोट्या वारशाचे ओझे
माझ्या शिरी देऊ नकोस
माझे माऊली !
अश्या वंशाला वाढविण्यापेक्षा
तू पंढरीची वाट चाल
मी पडक्या वाड्याच्या प्रवेशद्वाराची
पायरी होऊन इथेच राहीन !

अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी............ .........

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............

दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,

उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........
ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी............ ......... ....

तू दिलेली शपथ

तुझ्या त्या असाध्य आजारात
मी पण मरत होतो तुझ्या बरोबरच
कणा कणाने .. क्षणा क्षणाने
तेव्हाच ठरवल होत..
ताजमहाल बांधून दिखवा करण्यापेक्षा
सरळ तुझ्या मागेच चालत जाव
पलीकडच्या आकाशात

पण अगदी शेवटच्या क्षणी
तू दिलेली शपथ ... 'माझ्या साठी जग'
आणि निघून गेलीस .... एकटीच ...

तसा मी अजुन जिवंत आहे ग ...
पण काय होत माहितीये
तुझ्या शिवाय ईथे जगता येत नाही
अन् .. तुझ्या शपथे साठी .. मरताही येत नाही

मी माघार घ्यायला शिकलोय.....

मी माघार घ्यायला शिकलोय
पिउन तुझ्या आठवानिना
या डोळ्यातल्या आश्रुना
जागा देऊन शकलोय

मी माघार घ्यायला शिकलोय
ह्रुदयाचे झाले तुकडे
प्रेमाच्या वलवंटात इकडे
ते वेचायला कंटाळलोय

मी माघार घ्यायला शिकलोय
हजारदा येउदे समुद्र लाटा
त्याचीच एक झालोय छटा
कण कण आता विराघळलोय

मी माघार घ्यायला शिकलोय
झगडत नहीं कलोकाशी
स्वतहाला त्याच्या कुशी
सामावून जायला निघालोय

मी माघार घ्यायला शिकलोय
तोडून आनायाचे होते तारे
आकाश झाले रीते सारे
एक टक बघत बसलोय


मी माघार घ्यायला शिकलोय
सारीपाट हा जीवनाचा
कस काय मोडायचा
आठवनिना तुझ्या मुकलोय

मी माघार घ्यायला शिकलोय.........

Thursday, February 26, 2009

उद्वेग विसरून कसं चालेल?

आयुष्यात केव्हातरी
मुखवटे चढवावे लागतात
रंगलेल्या तोंडाचे मुके घेतल्यावर
भंगलेल्या तोंडाचेही मुके
घ्यावे लागतात

मी असा असतानाही
मी तसा आहे ह्याचं
नाटक करावं लागतं
पण मग
हे नाटकच आहे हे
विसरून कसं चालेल?

कसले कसले
असले तसले झाले
की मग
असले तसले
कसले कसले होतात
आणि मग
मी माझ्याच हिंमतीवर आलो
आणि
माझ्याच हिंमतीवर रहाणार
असे म्हणताना
ही हिंमत तात्पुर्ती आहे
हे विसरून कसं चालेल?

अंधार दूर करणारा
प्रकाश पाहून
कंदीलाचे आभार मानावे लागतात
पण मग
कंदील हातात धरून
प्रकाश दाखवणाऱ्याला
विसरून कसं चालेल?

गेले ते गेले
आणि राहीलेले पण जाणार
असे म्हणताना
आपण पण राहील्यातले आहो
हे विसरून कसं चालेल?

जो तो आपल्या अक्कलेने बोलतो
पण मग अक्कलच गहाण ठेवली
तर मग
मुर्खपणाचं बोलणं होतं
हे विसरून कसं चालेल?

लहानानी मोठ्यासारखं वागावं
अन
मोठ्यानी मोठ्यासारखं वागावं
पण मग

मोठेच लहानासारखे वागले
तर मग
मोठेपणाचे महत्व
विसरून कसं चालेल?

शेवटी काय?

जात्यात रगडलेले पाहून
सुपातले हंसतात
पण मग
सुपातल्यानाही जात्यात जावं लागणार
हे विसरून कसं चालेल?

स्वप्नील............

मागे वळून पाहता.........

मरण मला पाहून हंसले

मागे वळून मी पाहिले
माझेच मरण मला पाहून हंसले
हंसण्याचे काय कारण पुसता
म्हणाले ते
आलीच वेळ नेण्याची, न विसरता

असते मी सदैव सर्वांच्या मागे
सावली होऊन पहाते कोण कसा वागे
झडप घालते पाहून तो गाफील
जो न समजे जीवन असे मुष्कील

खातो मी सदैव हेल्थी फूड
ठेवीतो माझे मी आनंदी मूड
घेतो मी नियमीत व्यायाम
का मी नये राहू इथे कायम

जनन मरण असे निसर्गाचा नियम
घेशी तू काळजी तुझ्या जीवनाची
वाढवीशी मर्यादा तुझ्या आयुष्याची
जन्मणे हे जरी असे आजचे वृत्त
मरणे हे तरी असे उद्याचे सत्य......

स्वप्नील............

आजाचे गुपीत.........


एक होती तानुली
तिचं वय होत सहा
आणि गम्मत पहा
तिचा एक होत आजा
त्याचे वय होते सहा वर सहा
तानुली आजावर खूप प्रेम करायची
आजा पण तानुली वर खूप प्रेम करायचा
कधी कधी तिला आंघोळ घालायचा
तिचे अंग पुसून कपडे घालायचा
केस पुसून वेणी घालायचा
आणि डोळे मिटून गप्प बसायचा
तानुली म्हणायची थ्यान्क्यू आजा
आणि आजा म्हणायचा वेल्कम तानु
कधी कधी तानुली पण आजाला मदत करायची
आजा म्हणायचा थ्यान्क्यु तानु
आणि तानु म्हणायची वेल्कम आजा
आणि आजा डोळे मिटून गप्प बसायचा
एकदा तानुली म्हणाली
आजा तू डोळे का मिटतोस?गप्प का रहातोस?
आजा म्हणाला ते आहे एक गुपीत
मला गुपीत सांगशील का?
असं विचारलं तानुने
ओके तानु असं म्हटलं आजाने
ऐक
एक होती मुलगी
तिचं वय होत सहा
आणि तिचा एक होत डयाडी
त्याचे वय होत तिनावर सहा
ती डयाडीवर खूप प्रेम करायची
तिच्यावर डयाडी खूप प्रेम करायचा
कधी कधी तिला आंघोळ घालायचा
अंग पुसून कपडे घालायचा
केस पुसून वेणी घालायचा
आणि उघडया डोळ्याने
तिच्या कडे बघत बसायचा
मग ती खूप खूप हसायची
आणि डयाडी तिला जवळ घ्यायचा
हे ऐकून तानुली हसली
अन
आजाला त्या मुली सारखी दिसली
आजाने तानुलीला जवळ घेतलं
आणि तानुलीला गुपीत कळलं
गुपीत फ़ोडताना आजाला झाली घाई
कारण ती मुलगी होती तानुलीची आई.......


स्वप्नील............

ते दिवस निघून गेले..


मातेच्या मांडीवर माथे टेकून
थोपटण्याचा हट्ट करून
झोपी जाण्याचे
ते दिवस निघून गेले.

भावंडामधे हंसून खेळून
कधी मधी नाहक भांडून
क्शमा याचनाचे
ते दिवस निघून गेले

ग्रुहपाठ करून सुद्धा
शाळेत जाऊन
गुरुजीचा ओरडा खाण्याचे
ते दिवस निघून गेले

सुगंधी तेले चोपडून
केसाचा कोंबडा काढून
नेत्र पल्लवी करण्याचे
ते दिवस निघून गेले

घारीच्या पंखाचे बळ घेऊन
निळ्या नभाकडे न्याहाळून
ऊंच ऊंच भरारींच्या स्वपनांचे
ते दिवस निघून गेले

राजा राणीचा संसार करून
मनोरथाचे बंगले बांधून
विश्वाचे रहस्य उलगडण्याचे
ते दिवस निघून गेले

ग्रुहपाठाचे धडे घेऊन
संस्काराचे धडे देऊन
पिल्लांना जोपासण्याचे
ते दिवस निघून गेले

काऊ चिऊच्या गोष्टी सांगून
चिमण्या नातवंडाना अंगाई करून
झोपी जाण्याचे
ते दिवस निघून गेले

या यादीतील स्म्रुतीना
निश्चीत आहे अंत
त्यानंतर
दिवस निघून जाण्याचे
नसे कसला खंत..........

स्वप्नील............

शून्याची महती......

नेहमी प्रमाणे मी आणि तानुली तिच्या स्कूलबसची वाट बघत ड्राईव्ह्वेवर येरझारया घालीत होतो.सहजच मी तानुला म्हणालो ” तानुली,”दोन” “एका”पेक्षा मोठा,” तीन ” “दोना ” पेक्षा मोठा असे करत करत “नवू”सगळ्यांपेक्षा मोठा मग “शून्याचे” काय?
तानुला “शून्याचे”खूप वाईट वाटले.ते मला तिच्या चेहरयावरून दिसले.ती म्हणालीच “पुअर झीरो” मी म्हणालो “तानु,”झीरोच” खरा “हिरो” आहे.संध्याकाळी तूं शाळेतून आल्यावर “झीरोवर”एक कविता करतो.ती वाच्ल्यावर तुला कळेल “शून्याची”महती.

शून्याची महती

एकदां “दोन” म्हणे “एकाला”
आहेच मी तुझ्या पेक्षा मोठाला
ऐकून हे वाटे “तीनाला”
माहीत नाही का “एक” आणि “दोनाला”
मीच आहे त्यांच्या पेक्षा मोठला

दोन शिंगी “चार” होता आपल्या घरात
हे संभाषण गेले त्याच्या कानात
ओरडून तो म्हणाला वरच्या आवाजात
ऐकल कारे “एक” “दोन” आणि “तिना”
“पांच” “सहा” “सात” “आठ”आणि मीना
कबूल झालो आहे “नऊना”
तेच आहेत आमच्या पेक्षा मोठे

“शून्य” बिचारा कोपरयात होता बसून
ऐकून सारे आले त्याला भरभरून
स्वत:शीच म्हणाला
ठाऊक नाही त्यांना माझी किंमत
घेऊन मला शेजारी,जेव्हां
एखादा दाखवील हिम्मत
व्रुद्धी होईल त्याची कळत नकळत

सूर्य,चन्द्र,तारयांचा आहे
माझ्या सारखा आकार
पण सांगतात का ते कधी
आमचाच आहे सर्वांवर अधीकार

नको स्वत:ची शेखी मिरवूं
चढावर वरचढ असोतो छपून
करा बेरीज अथवा गुणाकार सगळे मिळून
त्यामूळे
घ्याल तुम्ही तुमची किंमत वाढऊन
लागू नका भागाकार वा
वजाबाकीच्या नादाला
लागेल ग्रहण तुमच्या किंमतीला

“एकाने” केली तक्रार “शून्याकडे”
नाही उपयोग माझा
करताना गुणाकार वा भागाकार
त्यावर
“शून्य”म्हणाला त्याला
करशील तूं व्रुद्धी बेरीज करताना
नंतर
“शून्य”पुसतो “एकाला”
आहे का माझा उपयोग
बेरीज करताना
खोड मात्र मोडतो मी
गुणाकार करताना

तात्पर्य काय?
म्हणे “शून्य”ईतर आकड्याना
“कमी लेखू नका कुणा
वेळ आली असताना
“शून्यसम”आकडाही
होत्याचे नव्हते
करतो सर्वाना.............

स्वप्नील............

ईश्वराचे कोडे............

म्हणे “वनस्रुष्टी” ईश्वराला
केलास तूं दुजा भाव
देवूनी वाचा अन
चाल “जीवस्रुष्टीला”

हंसला ईश्वर मनांत अपुल्या
म्हणे तो “वनस्रुष्टीला”
पस्तावलो मी वाटते मला
देऊन ते “जीवस्रुष्टीला”

एका बिजा पोटी तरुं कोटी
जन्म घेती सुमनें फळें
परी
वाचाळ होवूनी
केली “मानवानें”
सदैव भांडणे
दूर जावूनी विसरला
हा “मानव” अपुली मुळे........

स्वप्नील............

दातांची व्यथा........

एकदां जिभली बोले दातांस
मी अशी (बिचारी) एकटी
तुम्ही मात्र आहांत पुरे बत्तीस

मला नाही हाड न काड
मी आहे स्नायुचा गोळा
चुकून फिरले ईकडे तिकडे
तुम्ही करता माझा चोळामोळा
करिती ते (लोक) तुमचा उपयोग
म्हणती बोललो आम्ही जिभ “चाऊन”

ऐकून हे जिभलीचे संभाषण
दातं म्हणती तिला
वाईट सवंय आहे तुला
घेतली जिभ लावली टाळ्याला

बडबड करिशी तूं भारी
निस्तरावे लागे आम्हांपरी
वटवट तुझी ऐकून
म्हणती ते (लोक) वैतागून
गप्प रहाण्या काय घेशी
कां पाडू ती बत्तिशी?
(बिचारे दांत)......


स्वप्नील............

मम्मी आजीचा बर्थ डे.

मम्मी आजीची सत्तरी.

झालीस तूं आज सत्तर
एकोणपन्नास वर्ष्याच्या संसारात
त्रुप्त होवूनी असे वाटते
आज झाले ते बेहत्तर

प्रेम म्हणजे विश्वास
अन जीवनभरची साथ
प्रेम म्हणजे दु:खावर मात
आणि सुखाची बरसात

मुलेबाळे थोर आणि नातवंडे
जमली सारी ईकडॆ
आनंदी आनंद जिकडे तिकडे
वारा पण सांगे चोहीकडे
की आज आहे
मम्मी आजीचा बर्थ डे..........


स्वप्नील............

आजी आजाला काठीवीना ......

आजी आजाला काठीवीना चालण्याचे आपले मनोदय सांगत असताना,ते संभाषण तानुच्या कानावर पडते.स्वपनाळू तानु दुसऱ्या दिवशी आपले स्वप्न आजाला सांगते.

आजीची काठी.

चिमुकल्या तानुला
स्वप्न पडे पाहाटेला
आजी आणि काठी
एकमेकांशी बोलताना

काठी म्हणे आजीला
नको सोडू कधी मला
संगतीत राहून तुझ्या
महत्व आलेच मला

आजी सांगे काठीला
नकोच घालू गळ मला
इतक्या वर्षाच्या सोबतीने
आला कंटाळा तुझाच मला

ऐकून त्यांच्या संभाषणाला
म्हणे तानु स्वत:ला
स्वप्नांत का असेना
पाहीन माझ्या आजीला
काठीवीना चालताना..........


स्वप्नील............

कालाय तस्मै नम:


कालाय तस्मै नम:

सकाळ म्हणाली दुपारला
ही संध्याकाळ,
रोज कुजबुजत असते काळोखाशी
ऐकून हे,
दुपार सांगे तिला (सकाळला)
घेऊन तूं पण जाशी की
पहाटेला रोज फिरायला
अन,
देयी निरोप तुला ती (पहाट)
लगेच,पाहुनी सुर्याला

ऐकुनी त्यांचा संवाद
दिवस म्हणे रात्रीला
दोष असे हा सुर्याचा
करी तो
उदय अन अस्थ दिवसाचा

ऐकून हे,
रात्र सांगे दिवसाला
दोश नको देऊं तूं सुर्याला
दोष असे हा प्रुथ्वीचा
गर,गर फिरुनी सुर्याभोवती
जन्म दिला तिने ह्या सर्वांना

पाणावल्या डोळ्याने
म्हणे प्रुथ्वी सुर्याला
भलेपणाचेदिवससंपले
जन्म देऊनी ह्या सर्वांना
अन
मिळे दोष आपल्या दोघांना

स्तिथप्रद्न्य तो सुर्यनारायण
समजावी त्या माउलीला (प्रुथ्वीला)
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:

Monday, February 23, 2009

पुढच्या वळणावर उभा मी असेन!!!!!!!

बैचेन अशी होवू नकोस
मन भटकू देवू नकोस
मी येतोय तुझ्या जीवनात
माझी वाट तू पाहू नकोस

रस्त्याकडे डोळे लावू नकोस
भासांच्या मागे धावू नकोस
मी करेन तुझ्या ह्रदयात प्रवेश
मला इतरत्र तू शोधू नकोस

आरशात सारखं पाहू नकोस
ओठ आता रंगवू नकोस
मी जीवनचं तूझं रंगवून टाकेन
तू शरीर आपलं रंगवू नकोस

रात्र आता जागवू नकोस
जास्त विचार तू करु नकोस
मी येईन प्रत्यक्ष समोर तुझ्या
स्वप्नात मला तू शोधू नकोस

यापुढे...
तुझ्या ह्रदयाची धडधड मी असेन
तुझ्या स्वप्नातला राजकुमार मी असेन
तुझ्या आयुष्याचा सोबती मी असेन
तू आता तू नाहीस तर मीच असेन

दोनच पावलं एकटी चाल आता...
पुढच्या वळणावर उभा मी असेन...

तुझ मन नाही,तुझ रूप पाहील..........

तू माझ्याशी लग्न करशील...
एक अनोळखी मुलगा येईल,
तुझ मन नाही,तुझ रूप पाहील.
तुझ्या सुंदरतेवर भालुन नक्कीच,
तो लग्नाला होकार देईल.

मान्या आहे. तुझ्या चांगल्यासाठीच,
तुझे आई-वडील हा निर्णय घेतील.
पण एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील...

मग,तुझ्या भावनांशी खेळले जाणार,
कुणी बोलायला ,तर कुणी चालायला सांगणार,
हे सर्व झाल्यानतर, हुंडयाच्या नावाखाली,
तो तुझ्या आई-वडिलांकडे भीक मागणार...

तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई वडील,
त्याला ही भीक द्यायला तयार होतील,
पण एका भीकार्‍या शी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील...

यदा कदाचित,
तो मुलगा चांगला निघाला तरी...
फक्त जीवनाशी तडजोड म्हणून,
तो लग्नाला होकार देईल...
तुझे पालक ही त्याचे रूप आणि
मुखया म्हणजे किती हजारांची नोकरी आहे,
हे पाहून लग्नस मान्यता देतील...

पण जीवनाशी तडजोड करणार्‍या श्रीमनताशी,
काय तू जीवांभरच नात जोडशिल...अग
एका हृदयाने भिकारी मुळशी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील...

तो तुला बायको म्हणून घरात ठेवेल...
तू माझ्या हृदयात राहशील...
तो तुझ्या भावनाना समजावून घेण्याचा प्रयत्न करेल...
मी त्याच भावनांशी माझे नाते जोडेल...

हृदयतून निघालेल्या माझ्या या शब्दांवर,
मला माहीत आहे तू नक्कीच हसशील...
तरी पण............ .........
एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील...

व्हेलेंटाईन दिवस.......

१४ फेब्रुवारी
व्हेलेंटाईन दिवस
तरुणाईचा दिवस
प्रत्येक मनातला दिवस
मनातल्या प्रत्येकासाठीचा दिवस

असा हा प्रेमाचा दिवस
लवकरच येणार आहे
कुणास ठाउक यावर्षी किती
ह्रदयांचा वेध घेणार आहे

पुन्हा भेटवस्तुची दुकाने
कार्ड आणि गिफ्टस् नी भरतील
कॉलेज कट्टे, बागा गुलाबी
रंगात न्हाउन निघतील

प्रत्येक जण आपला आपला प्लान
बनवत असतो आणि तो
इतरांहून कसा वेगळा आहे
हे ग्रुपला पटवुन देत असतो

यातले most प्लान
पार पडतच नाहीत
घेतलेली गिफ्ट, गुलाबे
तिला पोहचतच नाहीत

गुलाबं कोमेजतात
गिफ्ट कपाटात जातात
मनातल्या भावना
मनातच विरुन जातात

पण मित्रा हार मानु नकोस,
पुढल्या वर्षी तुझ्या हातातले गुलाब
तिच्या हातात असेल
कुणी सांगावे कदाचीत
तिच्या कपाटातही न दिलेल्या
गिफ्टची आरास असेल.........

फक्त दोन अक्षरं...

हवी होती फक्त दोन अक्षरं
पहिलं होत 'प्रे', दुसरं होतं 'म'

'म' म्हणजे मन माझं
'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी

धुंद अश्या मना माझ्या
लागली आस प्रेरणेची तुझ्या

वाटलं होतं एकदातरी जुळतील, हि अक्षरं
जुळनं राहिलं लांबच,बहुतेक होतील नश्वर

गेली वेळ निघुन आता, झाले
अक्षरांचे शब्दांतर
दुसऱ्या अक्षराच्या माझ्या, झाले आज 'त' त रुपांतर

हवी होती फक्त दोन अक्षरं



http://i149.photobucket.com/albums/s53/mechvishnu/Animations/d1at8.gif
"Any man can love a million girls but only a REAL MAN can love one girl in a million ways....
*Love one! Be good! Live well*."
Swapnil Kumar

आज तुझी खुप आठवण येत आहे....

आज तुझी खुप आठवण येत आहे...
नकळत डोळ्याच्या कढा पाणावतात, पण...पण...अश्रु येत नाही!
जशी शरीरावर ऐखादी जखम झाल्यावर, त्यावरची खपली गळूनं पडते,
पण डाग मात्र कायम रहातो, तूझ्या आठवणीची खपली कधीच गळून पडली,
पण...पण...मनावर डाग मात्र कायम राहीला. अगदी मरेपर्यन्त,
आज तुझी खुप आठवण येत आहे...
नकळत डोळ्याच्या कढा पाणावतात, पण.......पण....अश्रु येत नाही...!

"आय लव यु" बोलयचच राहतो"

"आय लव यु" बोलयचच राहतो
रेसकोर्सवर धावताना घोडा
हळुच घोडीकडे बघतो
आज रेस जिंकलो तर
डिनरला नेईन म्हणतो...

बघा दिवसा ढ्वळ्या पक्षी
पक्षीणीला साद देतो
" वाट बघु नकोस गं , चिमणे "
कोकिळेकडेच जेवणार सांगतो...

बोकोबाही चालु आमचा
चोरुन दुध पितो
हळुच दुध पिता पिता
मनीलाही चोरुन नेतो...

भुंग्यांचही बरं त्यांना
बोलायलाच कुणी नसतो
कधी जाई-जुई वर , तर
कधी रातराणी वरही बसतो...

मोतीचीच गंमत बघा
रोज मजा करतो
आज "पपीबरोबर" तर
उद्या "पिंकीबरोबर" फ़िरतो...

कसला माणूस बुद्धीमान
साला सगळीकडेच हरतो
म्हातारा होत आला तरी
"आय लव यु" बोलयचच राहतो...

मैत्रीचे नाते...

मित्रापेक्षा जास्त आणि प्रियकरापेक्षा कमी,
नाही रे, तोलत नाहिये मी ही अनमोल नाती...

पण आहेस तरी नक्की कोण तू माझा,
अवचित या मोहक वळणावर भेटलेला...

गुंफलेस तू धागे विश्वासाचे,
देतोहेस साथ,पाळतोय निती नियम ही जगाचे...

केवढी आहे आपली मित्र-मैत्रिणींची फौज,
तरी कुणातही नाही अजुन ही कुजबुज...

पण ठाऊक आहे हे दोघांना,
आवडतो आपण एकमेकांना...

घेतो दु:ख वाटून,अडचणी समजुन,
नाही दुखवत भावनांना...

पाठराखण करतो एकमेकांची,
रोजच उत्सुकता संवादाची...

ना ओढ आहे ही,ना आकर्षण,
ना दिलेय मन एकमेकांना आंदण...

पण,बोलायला लागले आहेत डोळे,
मैत्रीच्या वाटेवर फुलताहेत प्रेमाची फुले...

काय आहे तुझ्या मनात,
जरा बोल तरी शब्दांत...

खुप झालाय मजेशीर हा गुंता,
व्ह्ययलाच हवा आता उलगडा...

होईल का या नात्याची उकल,
एक मात्र जरुर कर...

मित्र 'रहाच' ,बनलास जरी प्रियकर,
कारण ,आपल्या मैत्रीचे नातेच तर आहे 'खरे' अमर...

Friday, February 20, 2009

हि जिदगी...........

काळा रंग एकदा पांढरयावर रुसला
तू चांगला, मी वाईट , कोपर्यात जाऊन बसला
समजूत काढावी कशी पांढ़र्यालाकळेना, ..
सुटलेली मैत्री, नव्याने जुळेना....

पांढरयाचं साकड़ देवाने एकलं...
रात्रीला एकदा रजेवर टाकलं..
माणूस राहिला जागा, घुबडालाही दिसेना...
काळोखाशिवाय कोणी आणि काही मागेना...

देवानी मग एक, अजुन केली मजा...
केसांना दिली पिकण्याची सजा..
पांढरया केसांखाली सुंदर काही दिसेना...
काळे केस सोडून कुणी काही मागेना...

गंमत म्हणून त्यानी गायब केली माती..
खायला झाला कहर आणि ओस पडली शेती..
भूकेपुढे दूसरा विचार मनात टिकेना....
काळया मातीशिवाय, कुणी काही मागेना...

काळे काळे ढ़ग करून टाकले नीळे...
ओस पडला गाव, पाण्यावीना तळे...
उन्हाची धग, काहीकेल्या सरेना...
काळे ढ़ग सोडून कुणी काही मागेना...

देव म्हणाला हळूच...'मला दोडके कुणी नाहीत...
तू कुठे, कुठे आहेस तुलाच नाही माहित..
दूसरा मोठा म्हणुन कुणी इथे हरेना...
एकाची जागा कुणी दूसरा कधी भरेना'....!!!!!!!!!


एक प्रवास मैत्रीचा.......

एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

Thursday, February 19, 2009

अशीच एक कविता झुरलेली...........

अशीच एक कविता झुरलेली
रात्र गहन होत जाते ना जशी
तशीच काहीशी मनात उतरलेली…
कुठुनशी एक झुळुक आलेली…
हसत हसतच एक ओळ देऊन गेली
ओलं झालेल मन माझ अजुन तसच आहे
रात्रीच्या स्पर्शात गोठलेल ते गाण
अजुनही तसच आहे..
अगदिच काही नाही
पण आपल थोड दुःख वाटुन गेली
जातांना मला बिलगून म्हणाली
भेटत जा की मधुन मधुन…
कधीतरी मन हलक करायला बर वाटत…
तुझ्या संगतीत माझ गाण बघ कस आपसुकच पुर होत
अशीच एक कविता झुरलेली..........

आय लव माय India.......

लहानपणापासून आपल्याला स्थितप्रज्ञ म्हणजे काय हे सांगण्यासाठी हा श्लोक ऐकवला जातो.

“सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ”.

म्हणजे असे की जो मनुष्य सुख आणि दु:ख, लाभ आणि हानी यांना समान मानतो तो स्थितप्रज्ञ. आणि सर्वांनी स्थितप्रज्ञ असावे, हे गुण अंगात आणावेत, किंवा स्थितप्रज्ञ माणसाचा आदर्श ठेवावा असे आपल्या मनावर बिंबवले जाते. पण परवा माझ्या वाचनात गीतेतला हा पूर्ण श्लोक आला. त्यामुळे माझ्या पटकन लक्षात आले, की अपूर्ण श्लोक आपल्या पूर्ण समाजाला सांगितल्यामुळे आपले एक समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून अत्यंत नुकसान झाले आहे.

पूर्ण श्लोक असा आहे,

सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ

ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥

- भगवद्गिता अध्याय २, श्लोक ३८

ह्याचा अर्थ असा, “सुख-दु:ख, लाभ आणि हानी, किंवा विजय व पराभव ह्यांना सारखं मानून तू युद्धासाठी तयार हो. म्हणजे तुला पाप लागणार नाही. ” . कुरूक्षेत्रावर स्वत:चा क्षत्रिय धर्म विसरून कर्मत्याग करणारया अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण स्वत: असा उपदेश करीत आहेत की, “युद्धात होणारया निर्णयाचा विचार न करता तू फक्त तुझे कर्तव्य कर. एक धनुर्धारी म्हणून, एक योद्धा म्हणून, एक क्षत्रिय म्हणून रणभूमीवर युद्ध करणॆ हे तुझे कर्तव्य आहे. तू केवळ तुझे कर्म कर व फळ मला अर्पण कर. त्यामुळे तुला कोणतेही पाप लागणार नाही.”

आता मी असे का लिहिले कि अर्धा श्लोक आम्हाला सांगितल्यामुळे आमच्या समाजाचे, राष्ट्राचे नुकसान झाले आहे? माझे असे मत आहे, की आम्हाला असे सांगण्यात आले की जर तुम्ही सगळे सहन केले आणि तरीही मन शांत ठेवले तर तुम्ही स्थितप्रज्ञ. कोणीही कितीही आक्रमणे करू दे, कोणीही कितीही लबाडीने वागू दे, कोणीही आमच्या देशावर आमच्या संस्कृतीवर हल्ले करू दे, पण आम्ही स्थितप्रज्ञ राहणे आवश्यक आहे. जगातील इतर देश श्रीमंत झाले तरी चालतील, आम्ही मात्र प्रगतीची, समृद्धीची वाट धरू नये, कारण सुखात काय आणि दु:खात काय शेवटी स्थितप्रज्ञ असणॆ महत्त्वाचे.

म्हणून एक राष्ट्र म्हणून, भारताने भगवान श्रीकृष्णांचा हा उपदेश, ह्या श्लोकात सांगितलेला, समजून, उमजून आचरणात आणला पाहिजे. तरच आमच्या राष्ट्राची प्रगती होईल आणि एक सुरक्षित आणि समृद्ध भारत निर्माण होईल.


आय लव माय India........

अशा सांजवेळी काव्य..............



आभाळ जेव्हा भरून येतं

तेव्हा माझ्याही मनात आठवणिंची काळोखी दाटते

सैरभैर होऊन मग घरटं चुकलेल्या पाखरासारखं

एकेक झाड ते शोधायला लागतं

कितीही समजावलं तरी त्याला उमगत नाही

की घरटं आता राहिलचं नाही

कालपर्यंत माझं जग होतं

त्यातलं काहीसुद्धा उरलं नाही

जाताना तू काहीसुद्धा नेलं नाहीस

म्हणालीस आता तेवढा वेळ नाही

तुझ्याशिवाय जगताना

माझ्याकडे तेवढं सोडून काही नाही

म्हणून म्हणतो परत ये

कधिही न जाण्यासाठी

किती पुरणार आठवणी

तुझ्याशिवाय जगण्यासाठी........

एकच................

ठरवलं ना एकदा…

ठरवलं ना एकदा…

मागे वळुन पुन्हा,
आता नाही बघायचं…

विसरलेल्या आठवणींना,
आता नाही आठवायचं…

चुकार हळव्या क्षणात,
आता नाही फसायचं…

अपेक्षांचे ओझे आता,
मनावर नाही बाळगायच…

नागमोडी वळणावर आता,
नाही जास्त रेंगाळायचं…

निसरड्या वाटेवर आता,
नाही आपण घसरायचं…

स्वतःच्या हाताने आता,
स्वतःला सावरायचं…

नी स्वतःचे आयुष्य,
स्वतःच आपण घडवायचं…

मराठी कविता

सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,

सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,

सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,

स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन

स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,

तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात……

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

मैत्री असावी अशी… मैत्रीसारखी

हसत राहणारी.., हसवत राहणारी…

संकटकाळी हात देणारी…

आनंदी समयी साद घालणारी…

मनाची कवाडे उघडून डोकावणारी…

काहीं गुपितांचे राखण करणारी…

मन मोकळे करुन सारं सांगणारी…

सांगता सांगता मोहीत करणारी…

कधी कुणाला न लुटणारी…

चांगल्याच कौतुक करणारी…

तितकीच चूका दाखविणारी…

शूध्द सोन्याप्रमाणे चम चम चमकणारी…,

मैत्री असावी अशी… मैत्रीसारखी

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं

अजुनही मला आठवतंय….
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो

Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो

Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्याने
Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत

आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती

चालु तासाला मागच्या बाकावर
Assignment copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो

खुप आठवतात ते दिवस…
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं………….

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

कुणीतरी हव असत……
कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देनार
हातात हात घेउन , शब्दान्शिवाय बोलनार्….

कुणीतरी हव असत ,जीवाला जीव देनार
फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपनार्……

कुणीतरी हव असत ,हक्कान् रागावनार,
चुका ज़ाल्या तरी,मायेन समज़ावनार……..

कुणीतरी हव असत ,आपल म्हननार
नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार……..

कुणीतरी हव असत ,बरोबर चालणार,
कशीही वाट असली तरी,माग न फ़िरनार……..

कुणीतरी हव असत ,वास्तवाच भान देणार,
कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासवे रमणार……

कुणीतरी हव असत,मनापासुन धीर देणार,
स्वतहाच्या दुखातही,मला सामाउन घेणार………

कुणीतरी हव असत,एकान्तातही रेन्गाळनार,
माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असनार….

कुणीतरी हव असत,विश्वास ठेवणार,
माझ्या विश्वासाला.कधीही न फ़सवणार…..

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~
आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.

आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.

भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.

गीतेच रस्ता योग्यच आहे

पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर पण
Movie सुध्धा enjoy करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
‘फ़ुलपाखरान्च्या’ सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.

द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल ?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या .

रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या ,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते,
गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते….
गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते,
तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते….
अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात,
चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात….
आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी,
चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी!!!!

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

दोस्ती नाम नहीं सिर्फ़ दोस्तों के साथ रेहने का..
बल्कि दोस्त ही जिन्दगी बन जाते हैं, दोस्ती में..

जरुरत नहीं पडती, दोस्त की तस्वीर की.
देखो जो आईना तो दोस्त नज़र आते हैं, दोस्ती में..

येह तो बहाना है कि मिल नहीं पाये दोस्तों से आज..
दिल पे हाथ रखते ही एहसास उनके हो जाते हैं, दोस्ती में..

नाम की तो जरूरत हई नहीं पडती इस रिश्ते मे कभी..
पूछे नाम अपना ओर, दोस्तॊं का बताते हैं, दोस्ती में..

कौन केहता है कि दोस्त हो सकते हैं जुदा कभी..
दूर रेह्कर भी दोस्त, बिल्कुल करीब नज़र आते हैं, दोस्ती में..

सिर्फ़ भ्रम हे कि दोस्त होते ह अलग-अलग..
दर्द हो इनको ओर, आंसू उनके आते हैं , दोस्ती में..

माना इश्क है खुदा, प्यार करने वालों के लिये “अभी”
पर हम तो अपना सिर झुकाते हैं, दोस्ती में..

ओर एक ही दवा है गम की दुनिया में क्युकि..
भूल के सारे गम, दोस्तों के साथ मुस्कुराते हैं, दोस्ती में..

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री………..

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात…

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

“आज अचानक भल्या पहाटे
एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध
आपसूकच दाखवून गेली

सांग ना !
काय तुझे आणि माझे नाते
उमजेल का, कधी मला ते

करून करून विचार जेव्हा
कधी नव्हे ते थकलो
गालांवरचा पाऊस मी
थांबवू नाही शकलो

मॆत्रीचे हे नाते अपुले
का आज एकतर्फी वाटले
पहाटेच्या या ऒल्या शणी
का कातरवेळ्चे ध्यास लागले

का तुझ्या डोळ्यात आज
शोधतोय मी पाऊस गाणे
धुक्याच्या या ओंजळीमध्ये
प्रेमरूपी दव थेंब माझे

सापडेल का या शणांना
कधी एक गोड किनारा
गालांवरच्या पावसाला
सावरणारा एक जिव्हाळा
सावरणारा एक जिव्हाळा”

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

गंध आवडला फुलाचा म्हणून… … फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात

भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे…

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं…

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं…
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं

मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी….
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

गंध आवडला फुलाचा म्हणून… … फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात

भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे…

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं…

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं…
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं

मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी….
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं….

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

मैत्री म्हणजे सुंदर पहाट

कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं

सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं

कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ

हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..

मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा

अन् जणू दरवळणारा मारवा

अंगावर घ्यावा असा राघवशेला

एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला…

ऍकत रहावी अशी हरीची बासरी

अस्मानीची असावी जशी एक परी…

मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी

दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात

नेहमीकरता असणारी तुझीचं साथ…..

सोबत रहा तू फक्त.. इतकंचं एक मागणं आहे…

तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

बोलण्यासारखे खुप आहे, सांगण्यासारखे काहीच नाही;
करण्यासारखे खुप आहे, होण्यासारखे काहीच नाही…..

कधी माझ्या डोळ्यात, खोलवर बघुन पहा;
सोसण्यासारखे खुप आहे, दुखण्यासारखे काहीच नाही…..

उभी रहा आरशासमोर, न्याहाळ स्वतःचे प्रतिबिंब;
मी दिसलो नाही तुला तर, बघण्यासारखे काहीच नाही…..

तुला नेहमीच वाटत असेल, मी तुझ्यावर प्रेम का करावं ते;
समजण्यासारखे खुप आहे, कळण्यास अवघड काहीच नाही…..

माझ्या नेत्रांतील आसवांची, तुला काय किंमत;
मानले तर अमृताचे थेंब आहेत, नुसते पाहिलेस तर काहीच नाहीत

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

क्यूं कहते हो मेरे साथ कुछ भी बेहतर नही होता
सच ये है के जैसा चाहो वैसा नही होता
कोई सह लेता है कोई कह लेता है क्यूँकी ग़म कभी ज़िंदगी से बढ़ कर नही होता
आज अपनो ने ही सीखा दिया हमे
यहाँ ठोकर देने वाला हैर पत्थर नही होता
क्यूं ज़िंदगी की मुश्क़िलो से हारे बैठे हो
इसके बिना कोई मंज़िल, कोई सफ़र नही होता
कोई तेरे साथ नही है तो भी ग़म ना कर
ख़ुद से बढ़ कर कोई दुनिया में हमसफ़र नही होता

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

तो मराठी मुलगा असतो !!
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत अनेक मुले असतात
पन जो सर्वात साधा सुधा दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत अनेक मुले असतात
पन जो सर्वांना सतत मदत करीत असतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले पिज़्ज़ा बर्गर खातात
पन जो नेहमी वडा पाव खातांना दिसतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीत मुले सिगरेट पिऊन येतात
पन जो घरुन पुजा करुनच येतो
तो मराठी मुलगा असतो !!

कंपनीमध्ये मुले मुलींना प्रोपोज करतात
पन जो आवडत्या मुलीला फ़क्त चोरुनच पहात असतो
तो मराठी मुलगा असतो !! …………

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

किसी के इतने पास न जा

के दूर जाना खौफ़ बन जाये

एक कदम पीछे देखने पर

सीधा रास्ता भी खाई नज़र आये

किसी को इतना अपना न बना

कि उसे खोने का डर लगा रहे

इसी डर के बीच एक दिन ऐसा न आये

तु पल पल खुद को ही खोने लगे

किसी के इतने सपने न देख

के काली रात भी रन्गीली लगे

आन्ख खुले तो बर्दाश्त न हो

जब सपना टूट टूट कर बिखरने लगे

किसी को इतना प्यार न कर

के बैठे बैठे आन्ख नम हो जाये

उसे गर मिले एक दर्द

इधर जिन्दगी के दो पल कम हो जाये

किसी के बारे मे इतना न सोच

कि सोच का मतलब ही वो बन जाये

भीड के बीच भी

लगे तन्हाई से जकडे गये

किसी को इतना याद न कर

कि जहा देखो वोही नज़र आये

राह देख देख कर कही ऐसा न हो

जिन्दगी पीछे छूट जाये

ऐसा सोच कर अकेले न रहना,

किसी के पास जाने से न डरना

न सोच अकेलेपन मे कोई गम नही,

खुद की परछाई देख बोलोगे “ये हम नही

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही..

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही
छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही…

का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन
हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण…

मनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही
पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही…

रात्री छान च असतात … तिच्या स्वप्नानी भरलेल्या
देऊन जातात उभारी … मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला…

प्रेम कधी सफल होते तर कधी नाही… ते जीवनात कधी ही सब कूच नसत
पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात ते नेहमीच जपायाच असत…

प्रेमाचे हे कोड कदाचित कधी च कुणाला उलगडणार नाही …
पण त्या साठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही…

~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~º~

स्वप्नील........